ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-मुनावळे परिसरातील कोयना प्रकल्प बाधितांना जमीन वाटप करा ग्रामस्थांची मागणी.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

मुनावळे परिसरातील कोयना प्रकल्प बाधितांना जमीन वाटप करा ग्रामस्थांची मागणी.

मुनावळे दि:
पर्यटन वाढीसाठी व शौकीन धन दांडग्यांची सोय पूर्ण करण्यासाठी सध्या निसर्गरम्य अशा कोयना जलाशया शेजारी मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट उभारणी होत आहे. याचे भूमिपूजन या भागातील सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होत आहे. परंतु मुनावळे येथील ५८ खातेदार व कळकोशी वाडी येथील १३ खातेदार असे एकूण ७१ खातेदारांना जमीन नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. ती आता देण्यात यावी अशी मागणी मनवळे येथील ग्रामस्थ करणार आहेत दरम्यान या ग्रामस्थांचे अध्यापे पुनर्वसन न झाल्याचे श्रेय नेमकं कुणाला द्यावं ? असा प्रश्न पडला आहे.

कोयना धरणातील शिवसागर जलाशयामुळे या भागातील अनेक गावं विस्थापित झालेले आहेत. सध्या भूमिपुत्रांच्या जागा धना दांडग्यांनी शासकीय अधिकारी व दलाल यच्या मदतीने घशात घातलेले आहेत. आता या ठिकाणी भूमिपुत्रांच्या हॉटेल व्यवसायापेक्षा धन दांडग्यांचे रिसॉर्ट उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे वॉटर स्पोर्ट स्कीम ही काही दलालांसाठी मटक्याचा संगम लागल्यासारखे वाटू लागले आहे.या गोष्टीला अनेक वर्ष झालेले आहेत. आता दुसरी पिढी ही उपजीविकेसाठी भटकत आहे. परंतु अद्यापही त्यांच्या जमिनीचे वाटप झालेले नाही. असे असताना जमिनीचे वाटप करण्यासाठी एकूण क्षेत्र १५९ एकर ३० गुंठे जमीन आहे. पण त्याचे धरणग्रस्तांना वाटप झालेले नाही. याबाबत ग्रामपंचायत मुनावळे यांनी आता आपल्या गावात येणाऱ्या मुख्यमंत्र्याकडेच लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी केली आहे..
कोयना धरणाच्या निर्मितीमुळे दस्तुरखुद मुख्यमंत्री यांनाच ठाणे येथे विस्थापित व्हावे लागले होते. त्यानंतर ते आमदार ते मुख्यमंत्री झाले पण त्यांच्या गावात शेजारील अनेकांचे अद्यापही योग्य व रीतसर असे पुनर्वसन झालेले नाही. पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. पण त्याला बगल देत आता वॉटर स्पोर्ट प्रकल्प तातडीने निर्माण केला जात आहे. आणि यासाठी आवश्यक निधी सुद्धा अगदी शिक्षण विभाग ,समाज कल्याण विभाग, व दिव्यांग विभागाच्या निधीमध्ये कपात करून दिला जात आहे .असा गंभीर आरोप आता होऊ लागलेला आहे.
खरं म्हणजे काही स्थानिक भूमिपुत्रांनी कर्ज काढून अनेक बोटी घेतलेली आहेत. आता या बोटी भंगार मध्ये काढायच्या की पर्यटन वाढीसाठी वापरत आणायच्या ? याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने द्यावी तसेच सदर प्रकल्पाला जी कमिटी स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये ज्यांच्या जमिनीत जास्त प्रमाणात गेलेले त्यांचा प्राधान्याने विचार करावा. असाही सूचित करण्यात आले आहे
हा प्रश्न कोणत्याही व्यक्तीचा नसून भविष्यात वॉटर स्पोर्ट परिसरात जाण्यासाठी चालक भूमिपुत्रांनाही शुल्क द्यावा लागणार आहे. आणि त्यानंतर होणाऱ्या वादावादीला जबाबदार कोण ? राष्ट्रीय महामार्गासाठी स्थानिकांच्या जमिनी घेण्यात आल्या पण त्यांनाही आता टोल माफी मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे अशीच अवस्था या वॉटर स्पोर्ट प्रकल्पांनी होणार का? असे बोलले जात आहे. त्यामुळे आत्ताच याबाबत मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे.
सध्या पर्यटकांची वाढती गर्दी व स्थानिकांना होणारा त्रास सहन करावा लागत आहे. उदाहरण द्यायचं झाले तर थंडगार शीतपेय पर्यटक पिऊन आपला आत्मा थंड करतात पण रिकाम्या बाटल्या व कचरा उचलण्याचे काम स्थानिक भूमिपुत्रांना करावे लागत आहे. हीच खूप मोठी शोकांतिका आहे. पैशाच्या जोरावरती व प्रसारमाध्यमाला हाताशी धरून काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत. या भागाचे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून रूपांतर केल्यास परिसरातील 105 गावांचा विकास होईल.

मुनावळे पर्यटन स्थळी स्कूबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे. “सरकारद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळाचा लाभ स्थानिक लोकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे. परंतु स्थानिक भूमिपुत्रांच्या यापूर्वीच ज्यांनी जमिनी खरेदी केलेले आहेत त्यांची टक्केवारी किती? व त्यांना लाभ किती मिळणार? हे सुद्धा स्थानिकांना पटवून सांगितले पाहिजे.
पर्यटन वाढीसाठी होणाऱ्या गोष्टीला स्थानिकांचा पाठिंबा आहे अधिकारी वर्गणी स्थानिकांना प्राधान्य देऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या पर्यटन वाढीसाठी अर्थसहाय्य करावे . त्यांना नागरी सुविधा निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे.

———————————————-

फोटो -मुनावळे परिसरातील निसर्गरम्य दृश्य (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button