वाई:-किसन वीर महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा : शहिदांना अभिवादन.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि.26
किसन वीर महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा : शहिदांना अभिवादन.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समिती, राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या शुभ हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. राज्यशास्त्र विभागतील श्री. राजेंद्र जायकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले, तसेच मुंबई येथे दिनांक २६/११/२००८ रोजी झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले किसन वीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी स्व. अंबादास पवार व स्व. बापूराव धूरगुडे व सर्व शहिदांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, मा. केशवराव पाडळे, संचालक मा, सुरेश यादव, पत्रकार मा. दत्ता मर्ढेकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भिमराव पटकुरे तसेच प्रो. डॉ. सुनील सावंत, प्रो. डॉ. ज्ञानदेव झांबरे, , प्रो. डॉ. विनोद वीर, श्री. बाळासाहेब कोकरे, डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. अंबादास सकट, डॉ. संग्राम थोरात, श्री. बाळासाहेब टेमकर यांची विशेष उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व ते म्हणाले, भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी मूल्यांचे शिकवण देणारे असून ते सर्व भारतीयांना एका भारतीयत्वाच्या धाग्यात गुंफणारे आहे. शहिदांना आदरांजली वाहताना ते असेही म्हणाले की, शहिद जवान स्व. अंबादास पवार व बापुराव धुरगुडे हे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्यात दाखविलेल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
संविधान दिनाविषयी माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले की, भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन जगातील सर्वोत्कृष्ट असे लिखित स्वरूपातील भारतीय संविधान तयार केले आहे. दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत भारतीय संविधानाचा औपचारिक स्विकार करण्यात आला. मसुदा समितीचे अध्यक्ष व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल आदिंकडे संविधान सुपूर्द केले व दिनांक २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान संपूर्ण देशात लागू करण्यात आले. याद्वारे आपल्या देशाची सत्ता जनतेच्या हाती देण्यात आली. भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. संविधानामुळे आपल्याला आपले हक्क, कर्तव्य, अधिकार व जबाबदाऱ्या समजतात. सांविधानिक मूल्ये जपणे व त्यांचा अंगीकार करणे ही आपली जबाबदारी असून सर्वांनी तिचे पालन केले पाहिजे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी केले.
२६/११/२००८ रोजी दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करताना प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले की, मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ला हा भारतीय इतिहासातील सर्वात भयंकर हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय पोलीस अधिकारी व नागरिक शहिद झाले. या सर्वांचे शौर्य, धाडस व देशप्रेम सदैव स्मरणात राहील. स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविकात सदर कार्यक्रमाचा उद्देश व भारतीय संविधानचे महत्व विशद केले व २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यातील शहिदांना विनम्र अभिवादन केले. डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राहुल तायडे, श्री. जितेंद्र चव्हाण, श्री. विशाल महांगडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.