सातारा:-छत्रपतींच्या राजधानीत कमळाची रांगोळी पाहून उपमुख्यमंत्री भारावले……….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
छत्रपतींच्या राजधानीत कमळाची रांगोळी पाहून उपमुख्यमंत्री भारावले……….
सातारा दि: सध्या निवडणुकीच्या प्रचार शिंगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवाराचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचले आहे. परंतु, सातारा छत्रपतींच्या राजधानीत नगरसेविका सौ रजनी जेथे व सामाजिक कार्यकर्ते राजू जेधे यांच्या दारातील कमळ चिन्हाची रांगोळी पाहून मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे आश्चर्यचकित होऊन भारावून गेले. त्यांनी स्वतःच्या मोबाईल मधून फोटो काढून छत्रपतींच्या राजधानीतील कमळाची रांगोळी देशभर पोहचवण्याच्या मानस व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारानिमित्त सर्वच राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते प्रचारक व उमेदवार प्रचारा निमित्त खेड्यापाड्यात वाड्या वस्तीमध्ये भेट देत आहेत. सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती पथनाट्य प्रात्यक्षिक व ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार बांधवांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेत आहेत. लोकशाहीचा हा उत्सव पाहण्यासाठी अनेक रथी महारथी सातारा जिल्ह्यात भेट देत आहेत. नुकतेच मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा व त्यांचे कार्यकर्ते यांनी सातारा शहरात धावता दौरा केला. सातारा शहरातील सर्व युगपुरुषांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून छत्रपतींच्या राजधानीला मानवंदना दिली. या त्यांच्या दौऱ्यानिमित्त सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असलेल्या जेधे कुटुंबीयांच्या निवासस्थानी सदर बाजार परिसरातील ते आले होते. प्रचार निमित्त त्यांना थकवा आला होता. परंतु, जेधे यांच्या दारातील कमळाची रांगोळी पाहून त्यांचा थकवा दूर झाला. त्यांनी या कमळाच्या रांगोळीचे मनापासून कौतुक केले. युवा कार्यकर्ता आदित्य जेधे यांच्याकडे त्यांनी याबाबत विचारणा करून फोटो काढण्याचा मोह असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सातारच्या नगरसेविका सौ रजनी जेधे ,सौ .अनघा भट्टड, सौ विद्या रोकडे, सौ अंजली यादव , सौ भारती जगताप, सौ अर्चना बाबर तसेच भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष राजू जेधे मनोज सोळंके अमित भिसे महेश कदम, उद्योजक विद्याधर गायकवाड, ऋतुराज शिंदे व आंबेडकर रमेश गायकवाड यांच्याशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यामध्ये शांततेत व कायदा व सुव्यवस्था राखून प्रचार यंत्रणा राबवत राबवली जात आहे .हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. अत्यंत शांतपणाने चाललेल्या या प्रचार यंत्रणेचा आदर्श नक्कीच सर्वांनी घ्यावा. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेश ला येऊन आवर्जून भेट घ्यावी असे त्यांनी निमंत्रण दिले.