खंडाळा:-महाराष्ट्रातील सर्वात कमी आंदोलन झालेला वाई मतदार संघ पुन्हा आ.पाटील सोबतच…. .
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
महाराष्ट्रातील सर्वात कमी आंदोलन झालेला वाई मतदार संघ पुन्हा आ.पाटील सोबतच…. .
खंडाळा दि: वाई- महाबळेश्वर- खंडाळा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मकरंदआबा पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व जाती धर्मातील सहकारी व ग्रामस्थ एकजुटीने प्रचार करत आहेत. निवडणुका आहेत म्हणून लोक सहभागी होत नाही तर सर्वाधिक कमी आंदोलन करणारा महाराष्ट्रातील वाई मतदार संघ म्हणजे आमदार मकरंद पाटील यांच्या कामाची पोहचपावती म्हणून लोक सहभागी होत आहेत. अशा शब्दांमध्ये बाळासाहेब पिसाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
स्वर्गीयखा .लक्ष्मणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब व अजितदादा पवार यांची समर्थ साथ देऊन सातारा जिल्हा राष्ट्रवादीमय केला आहे. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सहकार, पर्यटन, धार्मिक, शिक्षण व सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करून दिले होते. आजही त्यांच्या कार्याची ओळख सर्व दूर पसरलेली आहे. वाई- महाबळेश्वर- खंडाळा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला. तर दक्षिण काशी समजणाऱ्या वाईचे नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी नवीन पूल, नवीन पर्यटन स्थळआणि ज्या ठिकाणी कुसळ उभे राहत नव्हतं त्या खंडाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती केली. वाई व महाबळेश्वर तालुक्याला सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्याला उपाध्यक्ष पद व विविध समित्या कार्यकर्त्यांना देण्याचे कामही त्यांनी केले आहे.आज जे गावागावांमध्ये सुजलम सुफलम शेती व सुसज्ज बंगले- घरे-दर्जेदार रस्ते, स्वच्छ पाणीपुरवठा दिसत आहे. आणि विशेष म्हणजे जिथे सायकल परवडत नव्हती .त्या ठिकाणी चार चाकी वाहने आलेली आहेत. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने कृषी पर्यटनाला वाढ करण्यामध्ये महायुतीच्या सर्वच मान्यवर नेत्यांचे विशेष योगदान आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार या सर्वसामान्य मंदिरातील त्रिदेवचा आशीर्वाद लाभल्यामुळे वाई महाबळेश्वर खंडाळा मतदार संघ सुजलम होण्यामध्ये खूप मोठे योगदान मिळाले आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील बारामती असं वाईचा उल्लेख करावा लागेल .अशी चौफेर प्रगती होत आहे.
राजकारणात दिलेला शब्द पाळणे. हे राजकारणातील नीतिमत्ता अजित दादा पवार यांनी पाळून वाई तालुक्यातील बोपेगाव सारख्या एका खेड्यातील नवतरुण खासदार नितीन पाटील यांच्या रूपाने संसद गाजवणारे नेतृत्व दिलेले आहे. त्याचाही लाभ वाई- महाबळेश्वर- खंडाळा, कराड उत्तर, फलटण ,कोरेगाव या चार मतदारसंघात होणार आहे. सातारा मतदारसंघांमध्ये स्वयंपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणीही खा. नितीन पाटील यांना काम करण्याची संधी उपलब्ध होणारे आहे. ही निवडणूक म्हणजे आमदार मकरंदआबा पाटील यांनी दिलेल्या विश्वासाचे व विकासाचे नूतनीकरण आहे. त्यामुळे किमान ५० ते ८० हजार मताधिक्य देण्याचा संकल्प महायुतीने केलेला आहे. या त्यांच्या यशस्वी प्रचार यंत्रणे सोबतच त्यांचे सहकारी स्वयंपूर्ण प्रचारामध्ये उतरले असल्याचे चित्र दिसत आहे.
मुळातच वाई मतदार संघामध्ये शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवसैनिक व जुने शिवसैनिक हातात हात घालून घड्याळ बांधून प्रचारामध्ये नेहमीप्रमाणे सहभाग झालेले आहेत. याचा मनस्वी आनंद महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणाने व्यक्त केला आहे. बौद्धिक दृष्ट्या सुदृढ असलेल्या वाई- महाबळेश्वर – खंडाळा विधानसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक कमी आंदोलन झाली आहेत. याचा अर्थ अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आमदार मकरंद आबा पाटील यशस्वी ठरले असल्याचे मानण्यात येत आहे.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन