ताज्या घडामोडी

सातारा:-रिपब्लिकन पक्षाची अवस्था ना सन्मान ना पर्याय..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

रिपब्लिकन पक्षाची अवस्था ना सन्मान ना पर्याय..

सातारा दि: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्ताधारी जमात व्हा असा संदेश दिला होता. आणि स्वबळावर खासदार आमदार निवडून दाखवले होते. त्यांच्या पश्चात सध्या रिपब्लिकन पक्षाची अवस्था ना सन्मान.. ना पर्याय… अशी झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोन्ही प्रस्थापित पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचा वापर करून सत्ता हस्तगत केली. आता त्याचा वाटा देणे टाळल्यामुळेच रिपब्लिकन मतदार प्रचंड नाराज असल्याचे चित्र समोर आले आहे.
अनुसूचित जाती मधील जातीय वर्गीकरण करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने केला आहे त्यामुळे अनुसूचित जाती मधील घटक पक्षांमध्ये सुद्धा आता आघाडी व युतीबद्दल शंका येऊ लागलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे गट राज गवई गट असे प्रमुख चार गट सोडले तर दोन डझन गट रिपब्लिकन पक्षांमध्ये आहेत. त्यांची ताकद फारशी महाराष्ट्रात नाही. परंतु उत्तर प्रदेश मध्ये बहुजन समाज पक्ष व खासदार चंद्रशेखर आजाद यांच्या भीम आर्मीने तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित केले आहे. याची जाणीव आता रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी झालेली आहे.
३ ऑक्‍टोबर १९५७ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष पी. एन. राजभोज झाले. सचिव बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. उपाध्यक्ष बाबू आवळे तर सदस्य म्हणून दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे यांनी काम केले.वर्षभरातच पक्षात दुरुस्त-नादुरुस्त असे गट पडले. दुरुस्त गटात बी. सी. कांबळे, दादासाहेब रूपवते, एन.एम. कांबळे, बाबू हरिदास आवळे तर नादुरुस्त गटात दादासाहेब गायकवाड एन. शिवराज, बी. पी. मौर्य यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. आज हा इतिहास रिपब्लिकन पक्षाचा असला तरी सध्याच्या रिपब्लिकन पक्ष म्हणजे मार्ग न सापडल्याने गोंधळलेल्या प्रवाशासारखी झालेली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनामध्ये भाजपचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल गौरव आणि संविधानाबद्दल पुन्हा एकदा री ओढण्यात आली. संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार देण्याची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली परंतु आता संविधानाला मानणाऱ्या पक्ष सुद्धा रिपब्लिकन पक्षाला बाजूला करत आहे. यातच सर्व काही आलेले आहे. याची जाणीव आता रिपब्लिकन मतदारांना झाली असून महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसल्या तरच खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होणार आहे. दलित- आदिवासी -अल्पसंख्यांक व अस्पृश्य समाजावर अन्याय करणाऱ्या जातीसमूहाच्या युती आघाडी मधून उगम झाल्यामुळे अशी परिस्थिती झाली असल्याचे अभ्यासक सांगू लागलेले आहेत.
————-&&&————————————–
फोटो रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधिक स्वरूपातील फोटो (छाया- निनाद जगताप, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button