मायणी:-रब्बी पिकाच्या लागणीसाठी बळीराजाची धडपड.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके राष्ट्रीय संघटक
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
रब्बी पिकाच्या लागणीसाठी बळीराजाची धडपड.
मायणी प्रतिनिधी—–रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी शेतकऱ्याची धडपड सध्या सुरू झाली असून खटाव तालुक्यात ज्वारीची पेरणी 80 टक्के पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे यंदा पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्याने भूजल पातळी चांगलीच वाढ झाली अलीकडे परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरिपातील रखडलेल्या पिकांची काढणे सुरू झाली आहे त्यातच कडक उन्हाळ्यामुळे जमिनीचा ओलावा काहीसा कमी झाला आहे परतीचा कपाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतकरी अडचणीत आला आहे रब्बी हंगामातील पिकासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे मात्र आर्थिक चंचल भाषेत असल्याने बळीराजा कर्ज काढून रब्बीची तयारी करू लागला आहे सोयाबीनची काढणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे यंदा उत्पन्नात 50 ते 60 टक्के घट येणे शक्यता आहे थंडीची चाहूल लागताच रब्बीतील गहू पेरणी करण्याची तयारीला शेतकरी लागला असला तरी थंड हवामान नसल्यास थंड हवामानाची शेतकरी प्रतीक्षा करीत आहे हरभरा ज्वारी गहू पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता असल्याने ज्वारी व हरभरा या या पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे काही शेतकऱ्यांची ज्वारीच्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत ज्वारी उगवणीच्या अवस्थेत आहे मात्र गहू हरभरा पिकाला पोषक वातावरण नसल्याने पेरण्या सुरू झालेल्या नाहीत येत्या दीड-दोन महिन्यात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी ज्वारी पेरणी संपत आली आहे हरभरा पेरणी सुरू आहे थंडी पडतात ज्वारीची पेरणी सोडून शेतकरी गहू पेरणी करतील असा अंदाज.