कराड:-संशोधनामुळेच मानवाची प्रगती- प्रा.डॉ. लक्ष्मण साठे.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )
संशोधनामुळेच मानवाची प्रगती- प्रा.डॉ. लक्ष्मण साठे.
कराड (दि. १७, प्रतिनिधी) “विद्यार्थी दशेपासून संशोधक वृत्ती जोपासून जो विद्यार्थी एखाद्या घटकाचा अभ्यास करतो, तो जीवनात लवकर यशस्वी होतो. संशोधन हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. संशोधन एका घटकात किंवा विशिष्ट विषयात होत नाही तर प्रत्येक मानवी वृत्ती प्रवृत्ती, निसर्ग, विज्ञान या सर्व घटकांमध्ये संशोधन होते. फक्त विद्यार्थ्याकडे संशोधक वृत्ती असणे गरजेचे असते. आजपर्यंतचा मानवाचा विकास हा केवळ मानवाने संशोधन केल्यामुळेच झाला आहे.” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. लक्ष्मण साठे यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथे अग्रणी कॉलेज योजनेअंतर्गत मराठी विभाग आयोजित “शोधनिबंधाची लेखन पद्धती” या विषयावर बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे होत्या. अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की, “विद्यार्थी दशे पासून संशोधक वृत्ती जोपासणे गरजेचे आहे. संशोधनामुळे प्रत्येक विषयात खोलवर विचार करण्याची चिकित्सक वृत्ती वाढीस लागते. लेखनामुळे वैचारिक प्रगल्भता निर्माण होते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काही ना काही लेखन करणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या परिचय प्रा. प्रदीप चोपडे यांनी केला. तर आभार कु. शिवांजली जाधव हिने मानले. सूत्रसंचालन प्रा. व्ही. आय. आंबेकरी यांनी केले. या कार्यक्रमास कृष्णा महाविद्यालय, रेठरे येथील प्रा. महावीर कांबळे व विद्यार्थी, महिला महाविद्यालय, कराड येथील प्रा. विलास सुर्वे व विद्यार्थी उपस्थित होते. याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्रशासकीय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.