
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
वाई, महाबळेश्वर, खंडाळ्याचे पर्मनंट आमदार मकरंद आबा पाटील
प्रतिनिधी /अभिजीत
वाई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते मा आ मकरंद (आबा) लक्ष्मणराव पाटील हे मागील २००९ सालापासून वाई विधानसभेचे जननायक आमदार म्हणून सर्वांना सुपरीचीत आहेतआ मकरंद आबा यांना मा खासदार कै लक्ष्मणराव पाटील तात्यांचा राजकीय वारसा लाभलेला आहे तात्या हे देखील एक सामान्य कार्यकर्ता ते सरपंच या पदापासून ते सातारा लोकसभेचे दोन वेळा खासदार म्हणून कार्यरत होते त्याचबरोबर तात्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून अनेक वर्ष उत्कृष्ट काम पाहिले त्यांच्यातील कुशल नेतृत्व लाभल्यामुळे आज जिल्हा मध्यवर्ती बँक एक उत्तम बैंक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व देशात नावाजलेली बैंक आहे तोच वारसा आमदार मकरंद आबा यांचे बंधू नितीन काका पाटील यांनी देखील मिळवलेला आहे व आज ते देखील जिल्हा मध्यवर्ती बँकचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत आबांच्या कुटुंबातील मोठे बंधू मिलिंद दादा नितीन काका व संपूर्ण कुटुंबातील येथील
इतर सर्व सदस्य हे आबांच्या
सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असतात माननीय आमदार मकरंद आबा हे बोपेगाव चे सरपंच जिल्हा परिषद सदस्य ते २००९ पासून आज अखेरपर्यंत गेली पंधरा वर्षे लोकप्रिय आमदार म्हणून कार्यरत आहेत २४ तास जनतेच्या सहवासात राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे सन २००९ पासून मतदार संघामध्ये आबांनी अब्जावधी रुपयांची विकास कामे करून दाखवलेली आहे त्यामुळे एक समर्थ नेता म्हणून त्यांची ख्याती झालेली आहे मतदारसंघातील सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती हे आबांचे लक्ष आहे.
वाई विधानसभा मतदारसंघ हा क्षेत्रफळाचे दृष्टीने महाराष्ट्रात दोन नंबर क्रमांकाचा आहे मतदार संघातील महाबळेश्वर तालुका हा अतिवृष्टीचा तर खंडाळा हा दुष्काळी भाग असलेला आहे अशी परिस्थिती असली तरी मतदारसंघाचा समतोल राखून सर्वांगीण विकास करण्याचे काम आबा हे आपले कल्पक नेतृत्वाने करीत आहेत यामुळेच आबांचे काम महाराष्ट्रातील एक आदर्श
आमदार म्हणून सर्वश्रुत आहे आबा अजित पवार गटांमध्ये राहून मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदार संघासाठी खेचून आणत आहेत साखर कारखान्यातील मागील संचालक मंडळाने भ्रष्ट कारभारामुळे सहकारातील किसनवीर साखर कारखाना व खंडाळा साखर कारखाना अडचणीत आणला होता सदरचे कारखाने हे कायमचे बंद होतील अशी स्थिती करून ठेवली होती त्यामुळे यावर अवलंबित असणारे शेतकरी कर्मचारी यांची
परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती. शेतकऱ्यांचे ऊस बिले दिली जात नव्हती तसेच कामगारांना दोन अडीच वर्षांचा पगार देखील दिला गेला नव्हता हे दुःख आबांनी व काकांनी पाहिले व आपले लोकांना यातून बाहेर काढले पाहिजे ही तळमळ मनाशी ठेवून कारखाना या भ्रष्ट लोकांकडून लोकशाही मार्गाने सामान्य जनतेचा राहिला पाहिजे यासाठी पॅनल उभे करून कारखाना लोकांकडे पुन्हा आणला यामध्ये आबा व नितीन काका या राम लक्ष्मणाच्या जोडीने २४ तास स्वतःला झोकून देऊन हे शिव धनुष्य उचलले आहे हे मतदारसंघातील लोकांना माहित आहे वाई मतदार संघात ४४ कोटीचा दुष्काळ निधी एकमेव मकरंद आबा पाटील यांनी मिळवून दिला तसेच किसनवीर साखर कारखाना खंडाळा साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांना ४६७ कोटी रुपयांची मदत मिळवून दिल्यामुळे ७५ हजार सभासद व कर्मचाऱ्यांचे खऱ्या अर्थाने कैवारी होण्याचे भाग्य आमदार मकरंद आबा पाटील यांना लाभले आहे. कारखान्याला मिळालेल्या मदतीमुळे दोन्ही कारखाने
सक्षमपणे सुरू होऊन शेतकरी
व कामगारांच्या जीवनात
आर्थिक विकास होणार आहे त्यामुळे त्यांनी आबांचे धन्यवाद मानले आहेत असे कार्यसम्राट नेतृत्व या तालुक्याला लाभले हे वाई तालुक्याचे भाग्यच आहे सन २०२४ च्या लोकसभेमध्ये मकरंद आबा यांनी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना समर्थ साथ देऊन त्यांच्या विजयामध्ये आपला वाटा दिलेला आहे या निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये अजित दादांनी मकरंद आबा पाटील यांना व त्यांचे बंधू नितीन काका यांना भविष्यात राजकीय मोठी संधी देण्याचे वचन दिलेले होते ते ही अजित दादांनी खरे करून दाखवले आहे .वाई विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा तसेच त्यांचे प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणाऱ्या आबा हे खऱ्या अर्थाने जननायक आहेत आबांच्या अफाट कार्यामुळे ते वाई मतदार संघाचे परमनंट आमदार राहतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
मात्र सध्या कार्यकर्त्यापासून नेता बनलो असे वाटलेल्या काहींना आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत त्यांची उंची व लायकी नसणारे आमदार मकरंद आबांवर बोलण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांची ही मेणबत्ती टिकणार नाही ज्यांना स्वतःचे गावामध्ये काय किंमत आहे याचे त्यांनी अवलोकन करावे केवळ सोशल मीडियावर चमकोगिरी करून कोणी आमदार होत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार या म्हणीप्रमाणे आबांचा विकासाचा वारू कोणी रोखू शकत नाही आबांना भविष्यात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी हीच सदिच्छा
.श्री.शिवाजीराव बाबर
मा. चेअरमन मकरंद पाटील आबा पतसंस्था
वाई- उडतारे ता.वाई सातारा