क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

वाई:-आधुनिक भारताचे भूषण.. बृजभूषण “मन की बात”

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

!! आधुनिक भारताचं भूषण.. बृजभूषण !!

कुस्ती खेळाविषयी भारत देशात पहिल्यापासूनच प्रचंड आकर्षण आहे, मान, सन्मान, प्रसिद्धी सर्व काही या खेळाशी जोडले आहे. प्रचंड मेहनत, सातत्य, चिकाटी असणारा हा खेळ आपल्या देशाचा मानबिंदू आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स सारख्या मानाच्या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदकं आपल्या देशाला कुस्तीपटूंनी मिळवून दिलेली आहेत. त्यात महिला खेळाडूंचा वाटा मोठा आहे. जगात भारत देशाची शान वाढवणाऱ्या महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाच्या, अत्याचाराच्या बळी ठरलेल्या आहेत, हे खेळाडू कोणी सामान्य नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवणारे साक्षी मलिक, विणेश फोगाट, बजरंग पुणीया यांनी स्वतःबरोबर देशाचं नाव जगात मोठं केलं आहे, जवळपास २५ पदकांची कमाई या खेळाडूंनी केलेली आहे, ७ महिला खेळाडूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेले आहेत २८ एप्रिल रोजी याप्रकरणी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत ७ महिला खेळाडूंमधील एक अल्पवयीन खेळाडू असल्याने त्यांच्यावर पाॅस्को कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे, असाच पाॅस्को आसाराम बापूवर लागलेला होता त्याला ना कुठली सवलत ना जामीन तात्काळ कारवाई,पाच वर्षांनी जन्मठेप शिक्षा सुनावली गेली आता ही तो तुरुंगात आहे तोच गुन्हा बृजभूषण यांच्यावरही आहे परंतु पोलीस व केंद्र सरकारकडून कुठलीही कारवाई होत नाही, ही घटना केंद्रातील भाजपा सरकारसाठी भूषणावह असेल बहुदा हीच त्यांची मन की बात असावी.
उत्तरप्रदेश मध्ये ६ वेळा खासदार असणारे बृजभूषण शरण सिंग भाजपाचे बिनीचे नेते आहेत, जवळपास ४० गुन्हे यांच्यावर दाखल आहेत, मजबूत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे हे प्रस्थ, यापूर्वी टाडाखाली बृजभूषण सिंग यांना शिक्षा झालेली आहे, खाजगी वृत्तवाहिनीला बोलताना तर चक्क यानी खुनाची कबुली दिलेली आहे, गेली १२ वर्षे हे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत, देशातील अनेक राज्य कुस्तीगीर संघ व महासंघाचे मतभेद असल्याने बऱ्याच कुस्तीपटूंना अनेक अडचणींना सामना करावा लागतो, राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पाठिंब्याशिवाय आंतरराष्ट्रीय खेळणं शक्य नाही तर नोकरी, प्रॅक्टिस व इतर सुविधांसाठी राज्य कुस्तीगीर संघटनेवर अवलंबून राहावे लागते याचाच फायदा घेऊन बृजभूषण सिंग यांनी अनेक महिला कुस्तीपटूंना वेठीस धरले आहे, दाखल गुन्ह्यात सांगितलेले आरोप प्रसिद्ध झाले आहेत ते इतके भयंकर व संतापजनक आहेत की त्याची सार्वत्रिक वाच्यता करणे हे अतिशय किळसवाणे आहे, उलटपक्षी इतक्या तरुणींशी संबंध ठेवायला मी काय शिलाजीत घेतो का असा निर्लज्जपणाचा बचाव याप्रकरणी बृजभूषण यांनी केला आहे.
२३ जानेवारी २०२३ पासून दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर हे अन्यायग्रस्त खेळाडू धरणे आंदोलनास बसले आहेत. खेळाडूंच्या आक्रोशाची दखल सरकारने आजपर्यंत घेतली नाही उलट पोलिसांनी महिला खेळाडूंशी केलेले वर्तन व जबरदस्ती हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे, आंदोलनकर्त्यांना भेटण्यास गेलेल्या महिला पत्रकार साक्षी जोशी यांची तर कपडे फाटेपर्यंत पोलिसांनी परवड केली,२८ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून दोन गुन्हे दाखल झाले परंतु कारवाई कुठलीच नाही २८ मे रोजीतर सर्व खेळाडूंनी कष्टकरून मेहनतीने मिळवलेली २५ मेडल्स हरिद्वार येथे गंगा नदीत सोडून देण्याचा निर्णय घेतला परंतु शेतकरी संघटनेच्या मध्यस्थीने हा निर्णय ५ जून पर्यंत पुढे ढकलण्यात आला, दिवसेंदिवस या आंदोलनाला देशव्यापी पाठिंबा मिळत आहे १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या टीमने अन्यायग्रस्त खेळाडूंची बाजू घेतली आहे. श्री राहुल गांधी व श्री पृथ्वीराज चव्हाण सो यांनीही आंदोलनकर्त्यांची पाठराखण केली आहे. महिला खेळाडूंना न्याय मिळवून देण्याकरता अनेकजण पुढे येत आहेत परंतु राजकीय दबावा मुळे, सत्तेच्या प्रभावामुळे याप्रकरणी समाजात तितकासा उठाव दिसत नाही विशेषत: राज्या- राज्यातील कुस्ती वंशावळीतील खेळाडूंचाही या आंदोलनास म्हणावा तसा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत नाही, रस्त्यावर उतरून पाठिंबा देण्याऐवजी हे खेळाडू कान पाडून आशाळभूत नजरेने या प्रकरणाकडे पाहत आहेत हे मात्र खेदजनक आहे.
‌‌ केंद्रातील भाजप सरकार या प्रकरणाकडे निर्विकारपणे पाहत आहे, एकूणच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बृजभूषण सिंग यांच्यावर कुठलीही कारवाई न करता पाठीशी घालण्याचा प्रयत्न यामागे दिसतो, एका बाजूला बेटी पढावो बेटी बचावो तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय महिला खेळाडूंची अशी अवहेलना, लोकशाही नागवण्याचे व लोकशाही छूमंतर करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार नेटाने करत आहे. बहुतेक २०२४ पर्यंत शिशुपालासारखे शंभर अपराध पूर्ण करण्याचा केंद्रातील भाजपा सरकारचा मानस असावा.
श्री कल्याण पिसाळ-देशमुख,
उपाध्यक्ष – वाई तालुका काँग्रेस कमिटी.
फोन- ९८५०४१२९०९

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button