सातारा:-पाडवा व भाऊबीज सणानिमित्त रांगेतही प्रचाराची पेटवली मशाल….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
पाडवा व भाऊबीज सणानिमित्त रांगेतही प्रचाराची पेटवली मशाल….
सातारा दि: सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत चांगलीच वाढली आहे. ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी प्रचार करण्याची नवयुक्ति उमेदवाराचे समर्थक करू लागले आहेत. पाडव्या दिवशी गोडधोड जेवण व त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी मासे व मटण चिकन घेण्यासाठी खवय्यांनी रांगेत उभे राहूनही प्रचाराची मशाल तेवत ठेवली . तो एक चर्चेचा विषय झालेला आहे.
शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा व रविवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा व भाऊबीज यानिमित्त शासकीय कार्यालयाला सुट्टी होती. त्याचबरोबर अनेकांसाठी सुट्टीचा दिवस असल्यामुळे या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात मासे चिकन मटण व मसाले घेण्यासाठी ग्राहक वर्गाची खूप मोठी गर्दी झाली होती. जागोजागी दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. या रांगेमधूनच निष्ठावंत समर्थकांनी आपापल्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराची नामी संधी शोधून काढली होती. आणि याला अनेकांनी चांगला प्रतिसादही दिला. मतदानाच्या निमित्ताने का होईना पण अनेकांनी नव्या जुन्या मित्रपरिवार- नातेवाईकांची गाठभेट घेतली.
सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत लोकांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करावे. यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दीपोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आचारसंहितेचे पालन करून कार्यक्रम घडवून आणला जात आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही अनेकांचे दिवाळ काढणारी असली तरी काहींसाठी सण साजरा करण्यामध्ये हातभार लागला. याच मोठ नवल वाटत आहे.
मटण दुकानाच्या बाहेर मटन खरेदी करण्यासाठी तीन ते चार तास लोक रांगेत उभे होते. काहींनी चिकन घेणे पसंत केले. तर काहींनी सुरमई ,पापलेट, बांगडा ,हलवा, कोळंबी, मांदेली, कटला, बोंबील घेण्यामध्ये धन्यता मानली. सातारा परिसरातील किमान १८० ते २०० दुकानांमधून सुमारे पावणे कोटी रुपयांचे मच्छी मटण ग्राहक वर्गणी खरेदी करून विक्रेत्यांची ही दिवाळी साजरी केली.
शाकाहार हा उत्तम आहार असून सुद्धा सातारकरांनी आता मांसाहारी जेवणाचे सुद्धा प्रमाण वाढवले असल्याचे दिसून आलेले आहे. दरम्यान, या रांगेमध्ये किमान दहा ते बारा जणांचा समूह राजकीय चर्चा करून सर्वांनी मतदान केले पाहिजे. असा आग्रह प्रचार करत होते. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे .आणि जर आपणाला उमेदवार पसंत नसेल तर नोटा हा सुद्धा पर्याय दिलेले आहे. त्यामुळे सातारा जावळी मध्ये जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी जसे समर्थक प्रचारात आघाडीवर आहेत .तशाच पद्धतीने शासकीय अधिकारी कर्मचारी सुद्धा जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला निश्चित यश मिळो. अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली. दरम्यान, दिवाळीच्या खास सणासाठी अनेक ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रसमलाई, बासुंदी ,सीताफळ श्रीखंड, आम्रखंड तयार करून शुद्ध व चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ दिल्याबद्दल ग्राहकांनी त्यांचे सुद्धा आभार मानले आहेत. स्थानिक भूमिपुत्रांच्याखाद्यपदार्थाला प्राधान्य दिल्याबद्दल अनेक नेत्यांनी त्यांचे आभार मानले. शेवटी शेतकऱ्यांनी सुद्धा आता दुग्ध व दुग्धजन्य पदार्थावर प्रक्रिया करून उद्योग वाढवल्याने स्थानिक पातळीवर त्यांचाही गौरव झाला याचे चित्र पाहण्यास मिळाले.