गंगापूर:-बाभुळगावला (नांगरे) महावितरणच्या गलथान कारभारामुळे बैलाचा तडफडून मृत्यू …
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
बाभुळगावला (नांगरे) महावितरणच्या गलथान कारभारामुळे बैलाचा तडफडून मृत्यू …
दैव बलवत्तर म्हणुन वाचला शेतकरी व दुसऱ्या बैलाचा जीव……
गंगापूर तालुक्यातील बाभुळगाव नांगरे येथे रविवारी दुपारी येथील शेतकरी शिवाजी संपत सोनवणे (गट नंबर 55)यांच्या बैलाला विजेचा धक्का लागल्याने तडफडून बैलाचा जागीच मृत्यू झाला तर दैव बलवत्तर म्हणुन शेतकरी शिवाजी सोनवणे वं त्यांचा दुसरा बैल यां धक्क्यातून वाचला.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूलचे कर्मचारी नेमणूकीच्या जागी राहण्याचे सक्ती असताना.घटना घडल्यानंतर व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आज रविवार असल्याने काही अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद होते त काही अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी शेतकरी कृती समितीचे इंजी.महेशभाई गुजर,शिवसेना जिल्हाउपप्रमुख नितीन कांजुने, बाभुळगाव ग्रामपंचायतचे राहुल थोरात,राष्ट्रवादी काँग्रेसचे आदेश रनयेवले,पशु वैद्यकीय सहाय्यक शेलार, दिनकर सोनवणे, विलास शेकनाथ सोनवणे,राजू जाधव, किशोर सोनवणे,सचिन सोनवणे, गोकुळ जाधव, सुनील गोरे, सचिन अंबादास चव्हाण, कचरू भानदास जाधव, गणेश राऊत,आदीची उपस्थिती होती दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी शेलार यांनी पंचनामा केला असून यांनी पंचनामा करून पोस्टमार्टम केले आहे.