खटाव:- तहसीलदारांच्या प्रयत्नाने भावकीतील रस्त्याच्या वादाने घेतला मोकळा श्वास,,,,
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
खटाव तहसीलदारांच्या प्रयत्नाने भावकीतील रस्त्याच्या वादाने घेतला मोकळा श्वास,,,,
वडूज दि: नैसर्गिक संकट हे आपण समजू शकतो परंतु, मानवी संकटामुळे अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आहे. विशेषता ग्रामीण भागात किरकोळ वादाने अनेकांचे स्वप्न भंग पावले आहे. मानसिक- आर्थिक- शारीरिक त्रास सहन करावा लागतो. परंतु खटावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण जमदाडे यांनी काही अर्जांचा संपूर्ण अभ्यास करून सम्यक मार्गाने रस्त्याचा प्रश्न सोडवला. त्यामुळे खऱ्या अर्थाने भावकीतील वादने मोकळा श्वास घेतला.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालयात विविध परवाने, दाखले तसेच महसुली विभागात अंतर्गत येणाऱ्या अनेक जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घ्यावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयामध्ये जमीन, जागेच्या प्रश्नाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. अगदी मालकीची जागा असून ही वहिवाटीला देत नाहीत. अशा स्वरूपाच्या तक्रारीमुळे अनेकांना हेलपाटे मारावे लागत होते. तर काहींमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते. या सर्व गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्वतः जागेवर जाऊन काही प्रकरणाचा निपटारा करण्याचा सपाटा लावलेला आहे. आता पर्यंत साडेतीनशे किरकोळ रस्ते मोकळे करून दिले आहेत.
काल शुक्रवार दि:२५ मे रोजी तहसील कार्यालयातील कामकाज उरकून श्री जमदाडे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. या ठिकाणी त्यांनी दोन्ही भावकीचे लोकांना एकत्र बोलून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागते. यामध्ये दुजाभाव करता येत नाही. तत्पूर्वी आपण एकमेकांना समजून घेऊन सामंजसपणाने मार्ग काढल्यास आपल्या मनासारखा निर्णय लागेल. असा स्पष्ट आदेश वजा सूचना केली. त्यानंतर गोपुज गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा त्याला सहमती दर्शवल्यानंतर गेले अनेक दिवसापासून दोनशे एकर क्षेत्रात जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याचा वाद मिटला. व २७ शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला.
कळंबी गावात दोन रस्त्याचे प्रश्न होते. या सरबांधावरील रस्त्याच्या अडचणीमुळे परीट वस्ती कडे जाणारा गट नंबर २२३ मधील अडथळा दूर करण्यास यश मिळाले आहे. काही शासकीय अधिकारी म्हणजे कागदी घोडे नाचवतात परंतु श्री जमदाडे यांनी प्रत्येक प्रकरण म्हणजे न्यायप्रविष्ठ बाब असू शकत नाही. याची जाणीव ठेवून मानवता भावनेतून काही अर्ज निपटारा करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे .गैरसमजुत व भावकीतील काही गोष्टी खटकत असल्यामुळे अनेकांना कारण नसतानाही न्यायालयाची पायरी चढावी लागते. कधीतरी वाद विकोपाला गेला की भांडण तंटा होते. शेवटी पोलीस ठाण्यापर्यंत हे भांडण जाते. या सर्व गोष्टीचे मूळ कारण म्हणजे जमिनीचे किरकोळ वाद असतात. हे वाद सामंजसपणाने सोडवण्यासाठीच राज्य शासनाने तंटामुक्त अभियान सुरू केले होते. पण, आता या अभियानाला फारसं म्हणावं असे लोकांनी मनावर घेतले नाही. त्यामुळे आता वाद मिटवण्यासाठी तहसील कार्यालय तसेच सक्षम अधिकाऱ्यांना व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करावे लागत आहे. ज्यांच्यामध्ये वाद आहेत ती मंडळी जर समंजस असतील व एकमेकांबद्दल आदरभाव व्यक्त करणारे असतील तर एका दिवसात एक प्रश्न सुटू शकतो. याची खात्री आता खटाव तालुक्याला पटलेली आहे.
काहींचा सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह परंतु काही जण व्यक्तिगत स्वार्थासाठी असत्याचा आग्रह करून तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरवत असतात. त्यांच्याकडे आपल्या मालकीचे कागदपत्रे नसतात. परंतु ,आम्ही सांगतो तेच खरे असे मानणारे काहीजण अज्ञानापोटी आपल्यावर अन्याय झाला. पैसे घेवून निर्णय घेतला.असे फक्त सांगतात. पण, कधी ही लेखी तक्रार दाखल करीत नाहीत. त्यांच्या कडे कागदपत्रं देण्याची मागणी करून ही ती दिली जात नाहीत. किंवा सखोल चौकशी केल्यानंतर त्यामध्येही तथ्य नसल्याचे आढळून आलेले आहे. शेवटी माणूस आहे हा चुका करू शकतो. तसेच दुरुस्त सुद्धा करून देतो. हे सुद्धा अनेकांना पटले आहे. दरम्यान ग्रामीण भागातील लोकांना रस्ता खुला करून देण्यापेक्षा त्यांच्या मनातील गैरसमज दूर केल्याचा मनस्वी आनंद वाटत आहे. शेवटी प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारीने काम करावे लागते आणि त्यातून लोक सुद्धा चांगल्या भावनेतून जर सहकार्य करत असतील तर अनेक प्रश्न हे पोलीस ठाणे अथवा न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर सुद्धा सोडवता येतात. याच्या मनस्वी आनंद झाल्याची प्रतिक्रिया खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली.
या त्यांच्या भूमिकेचे सामाजिक कार्यकर्ते दुष्यान पवार, नितीन राऊत, दत्ता केंगारे,नामदेव खराडे, विजय जाधव, ज्ञानेश्वर इंगवले ,बाळासाहेब जाधव, धंनजय चव्हाण व राजू फडतरे, रविंद्र खाडे अशा अनेक मान्यवरांनी स्वागत केले आहे.
—————————————————————–
फोटो- कळंबी व गोपुज या ठिकाणी रस्ता खुला करून दिल्यानंतर आनंद व्यक्त करताना ग्रामस्थ व तहसीलदार किरण जमदाडे (छाया- निनाद जगताप वडूज)