सातारा:-आर.पी.आय.नेते अशोक गायकवाड यांची प्रकट मुलाखत…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
आर.पी.आय. नेते अशोक गायकवाड यांची प्रकट मुलाखत…..
सातारा दि: पश्चिम महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व सातारचे सुपुत्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड यांची चळवळीत काम करणारे आर.पी.आय.(खा. आठवले गट) सातारा तालुकाध्यक्ष आप्पा तुपे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीचा धावता आढावा देत आहे.
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पसरणी तालुका वाई येथील सुपुत्र अशोक (बापू) वामनराव गायकवाड यांच्या सामाजिक राजकीय चळवळीला चाळीस वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त त्यांच्याशी मन मोकळेपणाने बातचीत करण्यात आली. यावेळी त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या जीवनाशी निगडित असलेल्या भारतीय दलित पॅंथर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय चळवळीतील अनेक किस्से सांगितले. त्यातील थोडक्यात म्हणजे १९८४-८५ च्या कालावधीमध्ये नुकतंच श्री अशोक गायकवाड यांचे लग्न झाले होते. तसेच त्यांना एक स्वप्निल नावाचा गोंडस मुलगा झाला होता. आपल्या व्यवसायाशी निगडित ते कार्यरत असताना त्यांचा भारतीय दलित पॅंथर या लढाऊ संघटनेची संबंध आला. वाई येथील टिळक ग्रंथालयांमध्ये भारतीय दलित पॅंथरचा मेळावा आयोजित करण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीला आदरणीय पॅंथर नेते भगवानराव जाधव, रुपेश मोरे, वामन गायकवाड, सुमन जावळे, रेखा कांबळे, अक्काताई कांबळे, मंगल कांबळे अशी जाणकार मंडळी वाई येथील प्रसिद्ध फुलेनगर येथे एकत्रित आले होते . या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील वाई मध्ये भारतीय दलित पॅंथरची स्थापना करण्याचा निर्णय झाला. पॅंथर युवा नेते महेंद्र खरात, प्रकाश कांबळे, सुनील मोरे, शरद जाधव, अशोक मोरे अशा पॅंथर चळवळीतील तरुणांना पद देताना संधी देण्यात आली. आणि याच वेळेला अशोक गायकवाड या तरुण कार्यकर्त्याला वाई तालुका उपाध्यक्षपदी वर्णी लावली. त्यांना पद देण्यापेक्षा त्यांना चळवळीचा अनुभव यावा. हा त्यामागे उद्देश होता. त्यानंतर अनेक खेड्यापाड्यांमध्ये भारतीय दलित पॅंथर उभे करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांसोबत परिश्रम घेतले. ज्या ठिकाणी दलित, मागासवर्गीयावर अन्याय झाल्याची माहिती कळताच ते व त्यांचे सहकारी चित्त्यासारखे धावून जात होते. जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस यंत्रणेला याची नोंद घ्यावी लागत होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचे नावलौकिक वाढू लागला. अशाच वेळेला त्यांच्यावर वाई शहरात प्राणघातक हल्ला झाला. त्यांना वाई येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच भारतीय दलित पॅंथरचा मेळावा रद्द करावा अशी सूचना आली. परंतु, त्यांचे वडील श्री वामनराव गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले मला चार खोंड आहेत. एक गेला तरी चालेल पण चळवळ थांबली नाही पाहिजे. या एका वाक्याने मेळावा मोठ्या धुमधडाक्यात झाला. आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला सुद्धा त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्यातील पॅंथर आजही जागृतपणाने वाटचाल करत आहे. वाई येथे झालेल्या या मेळाव्याचे नेतृत्व करणारे आदरणीय पार्थ पोळके, किशोर तपासे, गौतम सोनवणे, भरत सोनवणे, अशोक शिंदे, अशोक बैले, सुनील त्रिंबके, चंद्रकांत आहिवळे, अरुण गाडे ,अमोल गायकवाड, संजय गायकवाड, विजय मांडके, बाळू तपासे, चांदणे, गौतम वाघमारे असे लढाऊ पॅंथर यांची त्यांच्याशी चांगलीच ओळख झाली. त्यानंतर श्री अशोक गायकवाड यांचे झंझावात सुरू झाले. त्यांचा रांगडा व धाडसीपणामुळे त्यांना थोडं चळवळीपासून बाजूला ठेवावं अशी आग्रहाची विनंती काही सहकाऱ्यांनी पॅंथर नेते रामदास आठवले यांच्याकडे केली. ही मागणी पॅंथर नेते रामदास आठवले यांचे लक्षात आले की, श्री अशोक गायकवाड यांचे भारतीय दलित पॅंथर मधील कार्य वाढू लागल्यामुळे काहींना अडचण होत आहे. त्यामुळे भारतीय दलित पॅंथर नेते आठवले साहेब यांनी श्री गायकवाड यांना थेट वाई तालुकाध्यक्ष करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
तेव्हापासून अशोक गायकवाड हे भारतीय दलित पॅंथरचे पॅंथर म्हणून चांगलेच प्रकाश झोतात आले. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत असून १९८९ साली भारतीय दलित पॅंथरचे नेते आठवले साहेब यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची पुनर्बाधणी केली .सत्तेच्या माध्यमातून सामाजिक कल्याण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक सहकारी मित्रांच्या सहकार्यामुळे श्री अशोक गायकवाड हे आता महाराष्ट्रभर परिचित असलेले व्यक्तिमत्व झालेले आहे. दोन वेळा वायू विधानसभा व एक वेळ सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून त्यांनी लक्षवेधी मत घेतली होती.
गेले २५ वर्ष सातारा जिल्ह्यातील विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत असतानाही व आता महायुती सोबत असताना सुद्धा चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. आज त्यांचे सुपुत्र स्वप्निल गायकवाड हे त्यांच्यासोबत आंदोलनातून धडे घेत आहेत. पत्नी पसरणी गावच्या सरपंच म्हणून संपूर्ण गावाच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलत आहे. संपूर्ण गायकवाड कुटुंबीय हे फुले- शाहू- आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. आज सर्व जाती धर्मातील लोक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी जोडले गेलेले आहेत. भविष्यात या लढाऊ अशोक गायकवाड यांना किमान आदरणीय नेते रामदास आठवले साहेब यांनी राज्यसभा किंवा विधानपरिषदेवरची संधी देऊन त्यांच्या कार्याची पोहोच पावती द्यावी. अशी मागणी या निमित्त उपस्थित असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे.
या छोट्याशा मुलाखतीच्या वेळेला ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप,रिपब्लिकन कार्यकर्ते सुनील भालेराव, मयूर बनसोडे, शिवाजी सर्व गोड ,महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजकीय पटलावर आर.पी.आय. व अशोक (बापू )गायकवाड हे समीकरण झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेगण त्यांचा नेहमीच आदर करतात. त्यांच्या या ४५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीला अनेकांनी मानाचा जय भीम केलेला आहे.
———————————————-
फोटो- आरपीआय सातारा जिल्हा अधक्ष अशोक बापू गायकवाड यांची मुलाखत घेताना श्री आप्पा तुपे (छाया- अजित जगताप ,सातारा)