कराड:-नवनिर्माणाचे प्रतीक : गुणवंत विद्यार्थी सन्मान.
पत्रकार अभिजीत बल्लाळ कराड

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अभिजीत बल्लाळ कराड
RPS STAR NEWS
नवनिर्माणाचे प्रतीक : गुणवंत विद्यार्थी सन्मान.
कराड : श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट ,कराड यांच्या वतीने दिनांक 27 जुलै शनिवार रोजी शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल पारितोषिक देण्यात आली. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी विद्यार्थी तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक श्री. चैतन्य रघुनाथ कणसे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. जयंत (काका) पांडुरंग पाटील तसेच संस्थेचे खजिनदार श्री. संजय बदियाणी उपस्थित होते. या समारंभाचे अध्यक्ष उच्च शिक्षण मंडळाचे संचालक श्री नंदकुमार बटाणे तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.मानसिंग पाटील, श्री राजेंद्र माने हे ही या समारंभास उपस्थित होते.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री चैतन्य कणसे भाषणात म्हणाले,शाळा हे जीवनातील दुसरे कुटुंब आहे. जीवनातील जास्त वेळ या कुटुंबात आपण घालवतो. आपल्याला अनेक संधी शालेय जीवनात मिळतात. त्यातून आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. आपली जबाबदारी ओळखून शैक्षणिक संघर्ष चालू ठेवला तर आपले जीवन तावून निघते. त्यातून आपले व्यक्तिमत्व घडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात शाळेचा मोठा वाटा आहे. करिअरच्या दृष्टीने आपणाकडे दोन प्लॅन तयार असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जीवनाचीची वाटचाल करावी. यासाठी पालकांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
या समारंभाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बटाणे भाषणात म्हणाले श्री शिवाजी शिक्षण संस्था ही आदरणीय स्वर्गीय पी. डी.पाटीलसाहेब यांनी आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभी केली. तसेच आमदार मा. श्री. बाळासाहेब पाटील यांचेही मार्गदर्शन या संस्थेला होत असते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे पुढे या संस्थेची वाटचाल यशस्वी होईल. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक उंचावर जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या समारंभातील पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उषा थोरात यांनी केले .प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार श्री. संजय बदियाणी यांनी केले. अहवाल वाचन संस्थेचे संचालक श्री. राजेंद्र माने यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ. अनिता देशमुख यांनी करून दिली. प्रथम पारितोषक प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनी चिरंजीव श्रीशांत राऊत व कुमारी अलिशा संदे यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचे आभार सौ. सुप्रिया कुलकर्णी यांनी मानले तर समारंभाचे सूत्रसंचालन सौ वैशाली पानस्कर यांनी केले. या समारंभासाठी संस्थेतील पदाधिकारी, पालक,विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.