सातारा:-बलात्कारी आरोपींना भर चौकात फाशी द्या, पुरोगाम्यांची साताऱ्यात मागणी…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
बलात्कारी आरोपींना भर चौकात फाशी द्या, पुरोगाम्यांची साताऱ्यात मागणी…
सातारा दि: गुन्हेगार याला कोणतीही जात नसते. तर ती प्रवृत्ती आहे. त्यामुळे बलात्कारीला भर चौकात फाशी द्या. अशी मागणी साताऱ्यातील पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आरोपींना फाशी द्यावी म्हणून पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केलेली आहे. सर्वच जाती-धर्माच्या महिलांचे रक्षण करण्याची जबाबदारी आता निधर्मीयवादी व समतावादी कार्यकर्त्यांनाच करावी लागणार आहे. असे पुरोगामी कार्यकर्त्यांनी सांगितले.
नवी मुंबईतील कोपरखेरणे गावातील अक्षता आगस्कार- म्हात्रे यांच्याशी काही कारणास्तव अक्षता आणि त्यांच्या सासरच्या मंडळी बरोबर खटके उडत होते. घरातील वादामुळे त्रस्त झालेली ही अक्षता शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरात शांततेसाठी गेली होती. या ठिकाणी उत्तर प्रदेशातून आलेल्या तिन्ही पुजाऱ्यांनी अक्षतावर बलात्कार केला.
या घटनेतील आरोपी राजकुमार पांडे, संतोष कुमार मिश्रा आणि श्यामसुंदर शर्मा हे असून तीन आरोपींपैकी एक आरोपी फरार झाला होता, तर दोघे तिथेच आढळले. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. सासरी झालेल्या छळामुळे तिच्या सासरच्यांनाही जबाबदार धरून नवरा, सासू, सासरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अशीच दुसरी घटना उरण मध्ये घडली आहे. या ठिकाणी कर्नाटक राज्यात लपून बसलेल्या आरोपी शेख या सराईत गुन्हेगारांनी तरुणी यशश्री शिंदे हिची हत्या केल्यामुळे त्यालाही फाशी शिक्षा द्यावी. आरोपी शेख याच्यावर यापूर्वी २०१९ साली पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तरी त्याने दुसऱ्यांदा खुनाचा प्रकार केल्यामुळे त्याला भर चौकात मरेपर्यंत फाशी शिक्षा द्यावी. अशी मागणी करण्यात आली.
सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या मागणीसाठी साताऱ्यातील पुरोगामी कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम या दोन अभागी युवतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. चारही आरोपींना भर चौकात फाशी द्यावी. जेणेकरून गुन्हेगारांना पुन्हा या जगात जगता येऊ नये. यासाठी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत कायदेशीर तज्ञ मंडळी यांनी केली आहे. गुन्हेगाराला जात नसते त्यांना मानव म्हणजे मानव जातीचा अपमान आहे. त्यामुळे या चारही नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी. अशी आमची ठाम भूमिका असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा सय्यद, सौ. वैशाली जाधव, सौ.आरती गायकवाड व कुमारी पूजा कांबळे व पुरोगामी कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
—————&—————————-