पुणे:-कात्रज – दत्तनगर ते भारती विद्यापीठचा राजमाता भुयारी मार्ग अवकाळी पावसाने तुडूंब…..
प्रतिनिधी:- अब्दुलरहीम शेख कात्रज:-8087601074

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
कात्रज – दत्तनगर ते भारती विद्यापीठचा
राजमाता भुयारी मार्ग अवकाळी पावसाने तुडूंब…..
पुणे, दि. 12 (अब्दुलरहिम शेख) :- पुणे कात्रज मध्ये अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने दत्तनगर ते भारती विद्यापीठ रस्ता “राजमाता भुयारी मार्ग” हा पाण्याने भरुन वाहात असल्याने वाहन चालकांना पर्यायी रस्ता शोधावा लागत आहे.
हायवे लगत असलेल्या दत्तनगरचा राजमाता भुयारी मार्ग हा पावसाळ्यात तुडुंब भरुन वाहात असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असते. संबंधितांनी हायवेचा रस्ता आणि भुयारी मार्गाचा रस्ता याला जमिनीपासूनची उंची कमी ठेवल्याने आणि पावसाळ्यातील पाणी गटारे-नाल्यामध्ये न सोडल्याने पावसाच्या पाण्यामुळे रस्ता पाण्याखाली बुडालेला असतो.
रिक्षाचालकांना आणि टू व्हिलर तसेच कार व इतर वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी जनतेकडून संबंधितांना मदतीचा हाक मारली जात आहे.
दत्तनगर ते भारती विद्यापीठ रस्ता हा नागरिकांना ये जा करण्यासाठी जवळीक साधण्यासाठी सोयीस्करपणे आहे परंतु अरुंद असूनही आणि पावसाळ्यातील पाणी जमल्यावर होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती नागरिकांकडून करण्यात आली आहे.