गंगापूर:-सदगुरूंच्या नामाचा व कामाचा कधीही विसर पडू देऊ नका – सदगुरूंचे नाम हेच वेदशास्त्र..श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे प्रतिपादन.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
सदगुरूंच्या नामाचा व कामाचा कधीही विसर पडू देऊ नका – सदगुरूंचे नाम हेच वेदशास्त्र..श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे प्रतिपादन.
गंगापूर ता २१प्रतिनिधी
“सदगुरूंचे नाम मात्र,तेच आम्हा वेद शास्त्र, सकळा मंत्र वरिष्ठ मंत्र, नाम सर्वत्र गुरूंचे” या एकनाथी भागवतातील एकाच ओवीतून सदगुरुंच्या नामाला किती मोठे महत्व आहे हे लक्षात येईल.म्हणूनच सदगुरूंच्या नामाचा आणि सदगुरूंच्या कामाचा कधीही विसर पडू देऊ नका. समर्थ असतांना देखील सदगुरू कार्य केले नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होतात.आणि समर्थ नसतांनाही सदगुरूंचे कार्य करून दाखवल्यास आपली सर्वोच्य कीर्ती होते.याचा दाखला पाहायचा असल्यास रामायणात बघा सीता मातेचे हरण होत असतांना पक्षीराज जटायूने जीवाची पर्वा न करता रावणाशी युद्ध केले.त्याचा परिणाम जटायूस प्रभुरामचंद्रांच्या मांडीवर दिव्य मरण आले.आणि किर्तीमान ठरले.असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने भक्त परिवाराचे राजधानी आश्रम श्रीक्षेत्र वेरूळ येथे वार्षिक गुरुपौर्णिमा महोत्सवा निमित्त गेल्या आठवड्या भरापासून आयोजित विद्यार्थी संस्कार शिबिर,जपानुष्ठान,उपनयन संस्कार,प्रवचन,सत्संग,हस्तलिखित नामजप साधना यांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्याची सांगता आणि गुरुपौर्णिमा महोत्सवा निमित्त उपस्थित हजारो भाविकांना धर्मउपदेश करतांना अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज बोलत होते.ते पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्याचे अतूट नाते आहे.जीवनातील अंधकार दूर करायचा असेल तर सदगुरूंना शरण येऊन त्यांच्या आज्ञेचे पालन करावे.सदगुरू नामात मोठे सामर्थ्य आहे .ज्यांच्या मुखात सदगुरूंचे नामस्मरण असेल त्यांना प्रत्यक्ष काळही काही करू शकणार नाही.मात्र आवडीने भावाने नाम घ्यावे. आणि जो सदगुरूंची निष्काम भावनेने सेवा करेल त्याच्या पायी तर मोक्ष देखील लोटांगण घेईल. मात्र भागवतातील या ओवीचा अर्थ समजून घ्यावा लागेल.प्रत्येकामध्ये भगवंताचा वास आहे.त्यामुळे सर्वांशी प्रेमाने,नम्रतेने,आदराने वागा, सतत कामात आणि नामस्मरणात रहा,व्यसनापासून दूर राहा. सर्वांमध्ये वंदनीय रहाल असे कार्य
करा असेही समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी सांगितले.यावेळी उपस्थित हजारो भाविकांकडून पाच विधी पाठ व प्रत्येकी १३ माळांचा जप करून घेण्यात आला. श्रमदान परंपरेला अधिक गती देण्याचा संकल्प व रोज पाच विधी पाठाचा संकल्प करून घेण्यात आला.
गुरुपौर्णिमा महोसवाचा प्रारंभ ब्रम्हमुहूर्तावर करण्यात आला. पहाटे ४ वाजता संकल्पित समाधी मंदिरातील श्री बाबाजींच्या मूर्तीचा महाअभिषेक करण्यात आला. पहाटे ५ वाजता नित्यनियम विधी,ध्यान,प्राणायाम,भागवत वाचन,प्रवचन,सत्संग आदी कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर बाबाजींच्या पालखीची तसेच ओझरच्या जनशांती धामातील विविध मंदिरांवर बसवण्यात येणाऱ्या ४१ सुवर्ण कलशांची चांदीच्या रथात लक्षवेधी मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकी नंतर नाथनाला परिसरातील आश्रमिय गुरुकुलाच्या भव्य पटांगणात गुरुपौर्णिमेच्या मुख्य व भव्य-दिव्य सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषामध्ये समर्थ सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह श्री बाबाजी परंपरेतील संतांचे विशेष पूजन संपन्न झाले. यावेळी ब्रह्मवृदांच्या पवित्र मंत्र घोषात जगदगुरु बाबाजींच्या मुख्य पादुकांचा पाद्यपुजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उत्तराधिकारी समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची मिष्ठान्न तुला करण्यात आली. भाविकांनी सदगुरू अमृतवचनांचा लाभ घेतला.विशेष म्हणजे परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांनी व्यासपीठाच्या शेवटच्या भागातील भाविकांमध्ये येऊन नाचून गाऊन भजन म्हणत विशेष मार्गदर्शनही केले. गुरुपौर्णिमा उत्सवास राजकीय,सामाजिक,शैक्षणिक वैदकीय,सांस्कृतिक आशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आश्रमीय संतवृंदासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.काही विशेष भविकांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.यावेळी अतिथी,संत,ब्राम्हवृंद यांचेही पूजन करण्यात आले.अनंत विभूषित समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.