पंढरपूर:-आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृषी पंढरी महोत्सव-२०२४’ या कार्यक्रमाचे आज उद्घाटन
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
पंढरपूर दि.16 :
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृषी पंढरी महोत्सव-२०२४’ या कार्यक्रमाचे आज उद्घाटन
पंढरपूर दि.16 :
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृषी पंढरी महोत्सव-२०२४’ या कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित वारकरी बंधू भगिनी, शेतकरी व स्थानिक नागरिकांना संबोधित करताना सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना आपण सुरू केली आहे. वीजपंपावरील वीजबिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पीएम किसान सन्मान निधीत ६ हजारांची भर घालून १२ हजार देणारे, १ रुपयात पीक विमा देणारे, एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत करणारे, सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती समजून मदत करणारे असे आपले सरकार आहे असे सांगून शेती आणि शेतकऱ्यांना जे जे आवश्यक आहे ते सरकार नक्की करेल अशी ग्वाही दिली.
अशा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती मिळते, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या प्रदर्शनातील दालनांना भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि जिल्हा कृषी अधिकारी आणि राज्यभरातून आलेले असंख्य शेतकरी उपस्थित होते.