सातारा:-रियटर इंडियन एम्प्लॉईज फेडरेशनचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
रियटर इंडियन एम्प्लॉईज फेडरेशनचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण.
सातारा दि: रियटर इंडियन एम्प्लॉईज फेडरेशनच्या विविध मागण्यांसाठी गेली ४५ दिवस शिरवळ ता. खंडाळा या ठिकाणी कामगारांनी आंदोलन केले होते. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात. यासाठी मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, नेतेगण, शासकीय अधिकारी यांची भेट घेतली. पण कामगारांचे प्रश्न सोडवण्यास यश आले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर भर उन्हात रस्त्यावर आंदोलन केले. या आंदोलनामध्ये दोन महिन्याच्या बालकापासून ते कामगारांच्या वयोवृद्ध आई-वडिलांनी सहभाग घेतला होता.
संपाची नोटीस दिल्यानंतर संपात फूट पाडण्याचे हेतूने कामगार संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या एकूण बारा कामगारांना सेवेतून बडतर्फ केले. त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करून चौकशी सुरू केली.२० कामगारांना ट्रेनिंग व डेप्युटेशन नावाखाली चंदिगड व कोईमतुर या परराज्यात पाठवले. या सर्व निर्णयाची अंमलबजावणी न करता हे निर्णय रद्द करावे .या प्रमुख मागणीसाठी श्रमिक एकता महासंघ संलग्न रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन या मान्यताप्राप्त कामगार संघटनेने लोकशाही मार्गाने पंचेचाळीस विविध प्रकारे आंदोलन केले होते.
काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या रास्त असून त्या लवकर सोडवले जातील. असे पावसासारखे आश्वासन दिले. पण सध्या कडक उन्हाळा जशा पद्धतीने पडत आहे. अशा पद्धतीने या कडक उन्हात आश्वासन वाळून गेले. आता संबधित लोकप्रतिनिधी व अधिकारी या मागण्यांबाबत हात झटकत आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत लोकशाही मार्गाने मागण्या पोहचवण्यासाठी महिलावर्ग व कामगार वर्ग भर उन्हात बसलेले आहेत.
जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींना खरोखरच जर माणुसकी असेल तर त्यांनी किमान या तान्या बाळ्यांचा तरी विचार करावा. अशी मागणी विविध कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे .खरं म्हणजे दुष्काळी खंडाळा तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण झाली. त्यामुळे शिरवळ व खंडाळा परिसरात पैशासोबतच कामगार संघटनेचे पाऊस पडू लागलेला आहे. अनेक जण दुष्काळी कामात जाण्यापेक्षा कामगार नेता म्हणूनच वावरत असल्याने गोरगरीब कष्टकरी कामगारावर ही वेळ आल्याची टीका केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील कामगार आयुक्त कार्यालय असो किंवा श्रम मंत्रालय यांच्याकडे अधिकार असूनही संबंधित कंपनी विरोधात कायदेशीर रित्या कारवाई केली जात नाही. त्यामुळे कामगार देशोधडीला लागलेले आहेत. लोकप्रतिनिधी यांच्या बद्दलचा विश्वास उडाला आहे .त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आंदोलनापासून हटणार नाही. अशी शपथ कामगारांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कामगारांना रस्त्यापासून एका बाजूला बसवण्यात आले आहे .एरवी एखादा सामाजिक लढा घेऊन लढणाऱ्या संघटना संपूर्ण रस्ता बंद करतात. त्यावेळी पोलीस हतबल झालेले असतात. मात्र, कामगारांनी आपल्या शिस्तीचे पालन केले आहे. हे सुद्धा पाहण्यास मिळाले आहे.
———&——————————————-
कॅप्शन- सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर लहान मुल- कुटुंब आंदोलनासाठी बसले आहेत. (छाया- अजित जगताप, सातारा)