साताऱ्यात भाजी नव्हे चिखल मंडई दुरुस्तीची मागणी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात भाजी नव्हे चिखल मंडई दुरुस्तीची मागणी.
सातारा दि: शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातारा शहरात भाजी मंडईची निर्मिती केली. सातारा शहराच्या आजूबाजूचे शेतकरीवर्ग या ठिकाणी भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. सध्या साताऱ्यातील पोवई नाक्यावरील आकार नसलेली भाजी नव्हे तर चिखल मंडई झाल्याची टीका अनेक जण करू लागलेले आहेत. त्याची तातडीने देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी ग्राहक वर्गाने केलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरंट, संगमनगर तसेच जरंडेश्वर नाका परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी मंडई भरते. सातारा शहरातील पोवई नाक्यावर असलेल्या भाजी मंडईत चिखल साचलेला आहे . हा चिखल तुडवतच ग्राहकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. मंडईच्या तोंडालाच वाढत्या अतिक्रमण तसेच वाहनाच्या पार्किंगमुळे भाजी मंडईत प्रवेश करण्यासाठी जागा उरलेली नाही . आषाढी एकादशी व वारकरी सांप्रदायामुळे भाजी खरेदी करण्यास गर्दी होत आहे.
सातारा नगरपालिकेच्या वतीने दररोज भाजी मंडईचा कर वसूल केला जातो. पण, नागरी सुविधांबाबत कोणीही लक्ष देत नाही. या ठिकाणी काही दलाल व आजूबाजूच्या परिसरातील कष्टाळू व प्रामाणिक शेतकरी भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यातील अनेक विक्रीते हे प्रामाणिकपणाने व्यवसाय करत असल्याने त्यांचे व ग्राहकांचे ऋणानुबंध कायम टिकून राहिलेले आहेत. या उलट काही जण निबार भेंडी, दोडका व गवार, मेथी पालेभाज्या व भाजीपाला शहरी भागातील ग्राहकांना कवळी भाजी म्हणून माथी मारली जात आहे. ग्राहकांचे नजर चुकवून चुकून नासकी फळे दिली जातात. ग्राहकांची हुज्जत घालत असतात. याबाबत अन्न व औषध प्रशासन यांची तपासणी कधीही होत नाही. त्यामुळे नोकरदार व व्यावसायिक तसेच काही प्रांतीय लोक भाजी घेण्यासाठी एक तर संगमनगर किंवा राजवाड्याच्या भाजी मंडईला प्राधान्य देत आहेत.
कारण , पोवई नाका येथील भाजी मंडई मध्ये पाण्याचे डबके व चिखल साठला असून रोगराईला अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. उरल्या सुरल्या ग्राहकांनी या ठिकाणी भाजी विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ करूनच त्याचा वापर करावा. असा संदेश आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या काहींनी दिलेला आहे. सातारा नगरपालिकेच्या स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग व मंडईची कर आकारणी करणाऱ्यांनी या पोवई नाका येथील भाजी मंडई सुख सुविधांबाबत लक्ष न दिल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने लाक्षणिकरित्या भाजी मंडई बंद करण्याच्या आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, विशाल कांबळे, अरुण पवार, सचिन अवघडे, सचिन मोहिते व फळ विक्रेते यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रश्नांबाबत सातारा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट मुख्याधिकारी श्री अभिजीत बापट यांनी संबंधित विभागाला सूचना करून तातडीने या मंडळाची देखभाल दुरुस्ती करावी. यासाठी त्यांची भेट घेणार असल्याचे काही शेतकरी व भाजी- फळे विक्रेते यांनी सांगितले . ———————————-
सातारा येथील आकार नसलेली भाजी मंडईची दुरावस्था (छाया- अजित जगताप, सातारा)