सातारा:-ज्यांच्यासाठी साताऱ्यात जनसुनावणी तीच दिव्यांग महिला उपाशी…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
ज्यांच्यासाठी साताऱ्यात जनसुनावणी तीच दिव्यांग महिला उपाशी…
सातारा दि: सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये आज राज्य महिला आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन मध्ये ”” महिला आयोग आपल्या दारी “””” जन सुनावणी गुरुवार दिनांक २७ जून रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली. ज्यांची जन सुनावणी घेतली. त्या पैकी बहुतेक महिला घरातून सकाळीच उपाशी आल्या होत्या. यामध्ये वाई तालुक्यातील बावधन येथून आलेल्या एका दिव्यांग महिलेला पायाने चालता येत नव्हते त्यामुळे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीन पर्यंत ह जाऊ शकले नाहीत . अखेर मानवता भावनेतून पत्रकारांच्या सूचनेनुसार उपस्थित एका कर्मचाऱ्यांनी नाष्टा आणून दिला. तेव्हा त्या महिलेला दिलासा मिळाला.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या वतीने महिला आयोग आपल्या दारी जन सुनावली कार्यक्रम सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन मध्ये घेण्यात आला . आपल्याला न्याय मिळेल या भाबड्या आशेने सातारा जिल्ह्यातील अन्यायग्रस्त, निराधार, विधवा परितक्या व तक्रारीची कुणीही दखल न घेतल्यामुळे तक्रार करण्यासाठी आलेल्या महिला वर्गाची गर्दी झाली होती. यामध्ये बावधन माळ रानावर राहणाऱ्या महिला श्रीमती शिवाबई गायकवाड या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. .त्यांना पायाने चालता येत नव्हतं. परंतु ही बाब जिल्हा नियोजन भावनाच्या प्रवेशद्वारा जवळ उपस्थित असलेल्या काही पुरोगामी पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली . त्या दिल्यानंतर तातडीने एका ओळखीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नाश्ता दिला .
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ रूपालीताई चाकणकर यांच्यासह अनेक पॅनलचे शासकीय अधिकारी कर्मचारी व सदस्य, महसूल व पोलिस यंत्रणा तसेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी या जन सुनावलीला उपस्थित होते . त्यांनी सर्वांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर काही राजकीय व सामाजिक चळवळीतील महिलांनी आपल्या मोबाईलवर फोटोसेशन व सेल्फी काढून नाश्त्याचाही आस्वाद घेतला. परंतु जन सुनावणीसाठी आलेल्या काही गरीब महिला वर्गाला त्याची कल्पना नसल्यामुळे त्यांना नाश्त्याचा लाभ घेता आला नाही. काहींना आपली व्यथा मांडली . त्यांच्या प्रश्नाला तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही केल्या गेल्या. पण काही महिलंच्या फारसं हाती काही लागले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता घेऊनच त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या. राज्य महिला आयोग अध्यक्ष सौ रूपालीताई चाकणकर यांच्या जन सुनावणीमुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला असला तरी त्यांना नाश्त्याचा लाभ घेता आला नाही. हे अनेकांना खटकत होते. त्याचीही जोरदार चर्चा जिल्हा नियोजन भवन परिसरात सुरू होती.
.–&————-
चौकट दिव्यांग महिला श्रीमती गायकवाड यांच्या घरकुलाच्या प्रश्नाबाबत वाईचे गटविकास अधिकारी श्री विजय परीट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकारात्मक रित्या प्रतिसाद दिला .सदर महिलेच्या घरकुलाबबत शासकीय धोरणानुसार निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
—————————————-
फोटो – सातारा जिल्हा नियोजन भवनात महिला आयोग आपल्या दारी जन सुनावणी वेळी न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिव्यांग महिला (छाया- अजित जगताप, सातारा)