साताऱ्यात पापा कहते है बडा नाम करेगा…….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात पापा कहते है बडा नाम करेगा…….
सातारा दि: प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांच्या चित्रपटात पापा कहते है बडा नाम करेगा… बेटा ऐसा काम करेगा.. या गाण्याची आठवण साताऱ्यातील आदित्य रवी कांबळे यांच्या हाताकडे पाहिल्यानंतर नक्कीच प्रत्येकाला येत आहे.
याबाबत माहिती अशी की साताऱ्यातील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवसाय करणारे व सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे यांनी सामाजिक उपक्रम राबवून आपले नावलौकिक कमावले आहे. एवढेच नव्हे तर सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे ते आंदोलनातून जनक झालेले आहेत. त्यांना कुणी विसरणार नाही. पण, आपल्या या वडिलांचे कर्तव्य पाहून त्यांचे चिरंजीव आदित्य कांबळे यांनी आपल्या हातावरच आपल्या वडिलांची प्रतिमा गोंदून खऱ्या अर्थाने फादर डे दरवर्षी प्रामाणिकपणे साजरा करत आहेत.
चार वर्षांपूर्वी आठ हजार रुपये खर्च करून आदित्य कांबळे यांनी नट-नटी, देव- देवता व आपल्या मैत्रिणीचे नाव करण्यापेक्षा आपल्या जन्मदात्या वडिलांचे हातावर प्रतिमा गोंदून खऱ्या अर्थाने फादर डे साजरा करीत आहेत. वडिलांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात दिलेल्या खाऊच्या पैशातूनच आदित्यने सातारा शहरातील तांदूळ आळी येथील कुमार टॅटू मधून चार तास शांत बसून रवी कांबळे यांची प्रतिमा गोंदून घेतलेली आहे. श्री कांबळे यांची प्रतिमा गोंदून ती लोकांपर्यंत दिसावी. यासाठी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी व्यायाम व सामाजिक कार्य सुरूच ठेवले आहे .
आज आदित्य कांबळे यांच्या हातावरील रवी कांबळे यांची प्रतिमा लक्ष वेधून घेत आहे. अनेकदा जीवनदान मिळाल्यामुळे रवी कांबळे हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे येत आहेत.दुसऱ्याचे जीव वाचवण्यासाठी स्वतः उपक्रम राबवत आहेत.
सातारा येथे वीज पुरवठा सदोष यंत्रणेमुळे कुणालाही विजेचा धक्का बसू नये. यासाठी त्यांनी लोकशाही मार्गाने लेखी निवेदन दिले. पण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सातारचे अधिकाऱ्यांना त्याचा साधा धक्का सुद्धा बसला नाही. त्यामुळे रवी कांबळे यांनी स्वतःचे मुंडन करून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या साताऱ्याच्या अधिकाऱ्यांना आपले टक्कल दाखवून आता तरी काम करा. अशी सूचना केलेली आहे.
साताऱ्यात काही लोकप्रतिनिधी तसेच त्यांचे कार्यकर्ते आहेत. चहा पेक्षा किटली गरम असतं. असे काहींचे सामान्यांसाठी वागणे असते. त्यामुळे सामाजिक समस्यांचा ढिगारा वाढतच आहे. तो कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न रवी कांबळे व आदित्य कांबळे यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातारकरांना दिलासा मिळत आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
——————————————–
फोटो- सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे व त्यांच्या चिरंजीव आदित्य कांबळे तसेच वडिलांची प्रतिमा गोंदलेला हात (छाया- निनाद जगताप, सातारा)