सातारा:-कास पठारावर फुले उमलण्यापूर्वीच समितीच्या दादागिरीने पर्यटक हतबल.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
कास पठारावर फुले उमलण्यापूर्वीच समितीच्या दादागिरीने पर्यटक हतबल.
सातारा दि: जागतिक पर्यटन स्थळ म्हणून सातारचे कास पठार नावा रूपाला आल्यानंतर याकडे पर्यटक आकर्षित झालेले आहेत. अद्यापही फुलं उमलण्यास अवधी असतानाच हिरवी जाळी पसरवण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी कास पठार समितीच्या काही लोकांकडून पर्यटकांकडून चिरीमिरी वसूल करून त्यांना दंडात्मक कारवाईची भीती दाखवली जात असल्याची बाब उघडकीस आलेली आहे. यामुळे काही पर्यटक हतबल झाले असून ही समिती बरखास्त न केल्यास याबाबत न्यायालयात याचिका दाखल करू असा सज्जड दम पर्यटन प्रेमी लोकांनी दिलेला आहे.
कासचे पठारावर अनेक दुर्मीळ प्रजाती आहेत. या ठिकाणी स्थानिकांना चांगला रोजगारही मिळालेला आहे .त्याचे सर्वांनी मनापासून कौतुक केले आहे. दोन वर्षांपूर्वी कोणतेही सूक्ष्म संशोधन न करता कास पठारावर लोखंडी जाळी मारल्यामुळे फुलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. आता पूर्वीसारखी फुले येत नाहीत. एवढेच नव्हे तर जागतिक पर्यटन स्थळ असा नावलौकिक असलेल्या कास पठारावर अनेकजण खुलेआम पार्ट्या करून ”””काच ””’पठार करून टाकलेले आहे. याबाबत सायकलिंग करणाऱ्या अनेक युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याकडे लक्ष देण्यासाठी समितीच्या कोणालाही वेळ नाही.
शासकीय वरिष्ठ अधिकारी, वन विभाग यांच्याशी हितगुज व अर्थपूर्ण संबंध ठेवून काहीजण समितीमध्ये घुसलेले आहेत. त्यामुळे स्थानिक गरीब व कष्टकरी भूमिपुत्रांना त्याचा कोणताही लाभ मिळत नाही. ही बाब सुद्धा आता खटकू लागलेली आहे
कास पठार आज भारतात महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असून एक लाख ४० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापणाऱ्या पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध, जैवविविधता असणारे ठिकाण आहे.
युनेस्कोने २०१२ मध्ये, सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे आयोजित जागतिक वारसा समितीने अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष कास पठारला भेट देणाऱ्या शास्त्रज्ञ व संशोधन च्या माध्यमातून कास पठाराची “जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ ” म्हणून घोषणा केली आहे. दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात होताच या ठिकाणी दुर्मिळ असे फुल उमलतात. सुरुवात होत आहे. या कास पठारच्या लोकप्रियतेमुळे आता सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा पुष्प पठाराची माहिती वृत्तपत्रातून व सोशल मीडियातून दिली जात आहे परंतु खरं सौंदर्य हे कास पठारावरच पाहण्यास मिळते. सध्या कास पठारावरील जनावरांची संख्याही कमी कमी होऊ लागल्यामुळे तसेच अनेकांनी स्थलांतर केल्यामुळे कास पठारचे सौंदर्य धोक्यात आलेले आहे.
कास पठाराच्या आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्ष येथे आहे. तसेच कास पठारावर ८५० हून अधिक प्रकारच्या फुलांच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी ६२४ ह्या रेड डेटा बुक-२ मध्ये सूचीबद्ध आहेत. आणि त्यापैकी ३९ प्रजाती ह्या फक्त कास कास पठारावर आढळतात. गेल्या वर्षापासून
ऑनलाइन बुकिंगच्या सुविधेमुळे परदेशी व परराज्य पर जिल्ह्यातून येणारे पर्यटकांना मुक्तपणाने संचार करण्यास वेळ मिळत आहे. कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने या ठिकाणी पेट्रोलिंग व रेस्क्यू ऑपरेशन केले जाते. परंतु सध्या फुल उमलली नाही तोपर्यंतच काही पर्यटकांना दंडात्मक कारवाईची भीती दाखवून चिरीमिरी घेतली जात आहे. एवढेच नव्हे तर या परिसरात शूटिंग करणे. फोटो काढणे व प्रत्यक्षात फुल ज्या ठिकाणी उमलतात. त्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. पण,,,,,,,,,,,,,,,,,, हात ओला केला की, मैतर भला होतो,,,,,,, याची चुणूक पाहण्यास मिळाली आहे.
याबाबत सातारा जिल्हा प्रशासन वन विभाग व सातारा जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करावी. अन्यथा कास पठार कार्यकारी समिती बरखास्त करण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागेल. असाही इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान, ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनीही १५ ऑगस्ट नंतर व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंतच ऑनलाइन बुकिंग करावी त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्यास त्यांना ते स्वतः जबाबदार राहतील. कारण यावेळी कास पठारावर फुले नसतात. असे काही स्थानिकांनी सांगितले.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन