ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-महामार्गावरील बदेवाडी झाली पावसाळ्यात डबके वाडी. आंदोलनाचा इशारा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

महामार्गावरील बदेवाडी झाली पावसाळ्यात डबके वाडी. आंदोलनाचा इशारा.

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील बदेवाडी या ठिकाणी काल मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अक्षरशा महामार्गावर डबके तयार झाले त्यामुळे वाहन चालकांना अक्षरशा आदिवासी भागातून मार्गक्रमण करत असल्याचा अनुभव घ्यावा लागला. बदेवाडी चे नामकरण डबकेवाडी करा असेही उपरोधात्मक सांगण्यात येत आहे. याबाबत भुईंज प्रेस क्लबचे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे- बेंगलोर महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील भुईंज तालुका वाई हे राजकीय दृष्ट्या जागृत गाव म्हणून ओळखले जाते. आमदार- खासदार, मंत्री झालेल्या या गावांमध्ये बदेवाडी परिसर आहे. या बदेवाडी परिसरातूनच महामार्ग जातो. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यातील आनेवाडी व तासवडे या ठिकाणी फक्त टोल गोळा करणे. कोणते नागरी सुविधा न देता टोल वसुलीचा विक्रम करणे. असे विक्रमी कामगिरी केलेले आहे.
अनेक वाहन चालकांना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. पुणे जिल्हा व सांगली – कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी वाहनचालक व तेथील नागरिक हे अन्याय विरोधात पेटून उठतात. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाला महामार्गावर सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. या उलट सातारा जिल्ह्यात वेगळी परिस्थिती आहे.
पन्नास वर्षांपूर्वी क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख होती. आता हा इतिहास फक्त ऐतिहासिक संदर्भ देण्यासाठी जिवंत आहे. अन्यथा क्रांती कधीच होणार नाही. असे खेदाने नमूद करावे वाटत आहे.
वाई तालुक्यातील महामार्गावरील बदेवाडी पुल व सेवा रस्त्याच्या बोगदा भागात मुसळधार पावसामुळे कालव्याचे स्वरूप आले. पावसाच्या पाण्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या चुकीच्या नियोजनमुळे वाहधारक व सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रार करूनही महामार्गचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आले आहेत. याची चाड कोणत्याही लोकप्रतिनिधीला राहिलेली नाही. ही वस्तुस्थितीही समोर आलेली आहे.
शनिवार दिनांक ८ जून रोजी याच राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री एक मोठी दुर्घटना घडता घडता टळली आहे. पावसाचे पाणी महामार्गावर पाण्याचे डबके व तळ्यासारखे साठल्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवताना खूप कष्ट घ्यावे लागले. काही गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. एवढेच नव्हे तर सर्विस रोड म्हणजे बोगदा काढून जे बाजूला रस्ता दिलेला आहे. त्याची तर अवस्था फारच बिकट झाली होती. याकडे कुणाचेही लक्ष नाही.
नवनिर्वाचित सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे फलक लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर अभिनंदन वर्षा होत आहे. त्यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघात झालेले अवस्था म्हणजे मतदारांनी यासाठीच मत दिले आहेत का? असा प्रश्न या वेळेला अनेक वाहन चालकांनी उपस्थित केला.
दरम्यान, याबाबत भुईंज प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक महेंद्र जाधव यांच्यासह विविध सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळत नसल्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देत नाहीत. अशी सत्य परिस्थिती सांगणारी खंत वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद कांबळे व अमोल गंगावणे यांनी सुद्धा व्यक्त केली आहे.
———————————————-
भुईंज बदेवाडी परिसरात पावसामुळे झालेली दयनीय अवस्था

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button