सातारा:-साताऱ्यातील आपत्ती व्यवस्थापन बचाव प्रात्यक्षिका कराड येथे २८ मे रोजी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यातील आपत्ती व्यवस्थापन बचाव प्रात्यक्षिका कराड येथे २८ मे रोजी.
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत. त्याचे मॉक ड्रिल म्हणजे प्रात्यक्षिक कराड येथील प्रीतीसंगम या ठिकाणी मंगळवार दिनांक २८ मे रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील नदीकाठची गावे तसेच दरड प्रवर्ण गावे व नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना सुरू आहेत.त्याचबरोबर नगरपालिका टीम, युवक आपद मित्र, नोंदणीकृत सामाजिक संस्था व एन. डी. आर. एफ. यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यासाठी आठ बोटी, दीडशे लाइफ जॅकेट, दीडशे लाइफ बॉईज, रिंगा ,रोप वे 500 तसेच नदीकाठच्या गावांसाठी तरंगते प्लॉटिंग मल्टीस्ट्रेचर आधी साहित्य वितरित झाली आहेत.तालुकास्तरावर गाव पोलीस पाटील, ग्रामसेवक, शासकीय यंत्रणा यांना सूचनांचे तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे .
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व आपत्ती व्यवस्थापन समिती अधिकारी देविदास ताम्हाणे व शासकीय स्तरावरील गाव पातळीवरील कर्मचारी व अधिकारी हे सज्ज झालेले आहेत. नागरिकांनी दक्षता ठेवून आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य शासनाला सहकार्य करायचे आहे.
सातारा जिल्ह्यातील मिरगाव टोकावळे, आंबेकर, देवरुखवाडी आदी ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार झाले होते .बचाव कार्य गतीने व्हावे यासाठी जुलै महिन्यात एन.डी.आर.एफ. ची टीम साताऱ्यात दाखल होणार आहे.२००५ साली भिलार गाव खचल्यामुळे तातडीने उपाययोजना करून त्यांचे योग्य पुनर्वसन केले होते. सध्या आपत्ती व्यवस्थापन समिती मार्फत पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नदीकाठ व दरड कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. प्रीती संगम कराड या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती व संत चोखामेळा पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक २८ मे रोजी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.
चौकट ——
दरडी कोसळण्याच्या अनुषंगाने पूर्व संकेत ओळखणे व खबरदारीच्या उपाययोजना.————————-
सातारा जिल्हयातील डोंगराळ भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मूसळधार पावसामूळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भूजलाचे निरिक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
1. आपल्या आसपासच्या विहिरी, विंधन विहिरी (बोअर) जर 3 तासांहून अधिक काळ ओसांडून वाहत असतील तर ही दरड कोसळण्याची चाहूल समजावी.
2. जर अचानक अनेक नवीन झऱ्यांचा उगम आपल्याला आढळत असेल, झऱ्याच्या प्रवाहामध्ये पाचपट अथवा अधिक वाढ झालेली दिसत असेल अथवा झऱ्याच्या पाण्याचे तापमान हे
नैसर्गिक तापमानापेक्षा साधारण 5 अंश से. पेक्षा अधिक भासत असेल तर हि सुध्दा धोक्याची घंटा समजावी.
3. अतिवृष्टीमुळे झाडे, विदयुत पोल, तारांची कुंपणे, कलणे/तिरका होणे, इ. लक्षणे दिसू लागल्यास.
4. पक्षी व जनावरांच्या वर्तणूकीमध्ये अचानक बदल होणे (वेगळा आवाज काढणे / किंकाळणे,पायांनी जमिन उकरणे, पक्षी एकत्रित येणे इ.)
5. घरातून जमिनीतून पाण्याचे पाझर / उफळा फूटणे अथवा झरे निर्माण होणे. व घरातील फरशा उचकटणे.
6. जमिनीला नवीन ठिकाणी पाझर फुटणे.
7. नियमित येणाऱ्या झऱ्यातून अचानक गढूळ पाणी येऊ लागणे.
8. भात खचरांना भेगा पडणे.
वरील सर्व प्रकारची लक्षणे अतिवृष्टीच्या कालावधीत जाणवत असतील तर तेथील
नागरिकांनी त्या ठिकाणापासून किमान 500 मीटर दूर सुरक्षित ठिकाणी स्वतःहून स्थलांतरित होणे
अपेक्षित आहे. आणि अशा बाबीं निदर्शनास आलेस स्थानिक प्रशासनास (तलाठी, पोलीस पाटील,
कोतवाल, ग्रामसेवक इ.) यांचे निदर्शनास आणून दयाव्यात. अशी उपयुक्त सूचना जिल्हाधिकारी कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे त्याचा प्रसार व प्रचार स्थानिक पातळीवर सर्वांनी करावा असे सुचित करण्यात आले आहे.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏