सातारा:-ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन.
सातारा दि: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील त्यांच्या निवासस्थानी आज पहाटे निधन झाले. गेले अनेक दिवस ते आजारी व थकले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भुईंज येथील निवासस्थानातून मतदान करताना अखेरचे त्यांचे दर्शन झाले होते.
वाई तालुक्यातील महामार्गावरील भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली होती. चार वेळा वाई- खंडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतिनिधीत्व केले . राज्याचे कॅबिनेट मंत्री सुद्धा होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून तीन वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसची गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.
महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केली होती.काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी असतानाही त्यांचे चिरंजीव माजी आमदार मदन भोसले यांनी वाई – खंडाळा विधानसभा मतदारसंघात आघाडीचा धर्म न पाळता अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे आदरणीय प्रतापराव भोसले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. वैचारिक बांधिलकी व तत्त्वनिष्ठावंत राजकारणी अशी त्यांची प्रतिमा कायम स्मरणात राहणारी ठरली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आनेवाडी ता. जावळी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील जयसिंगराव फरांदे यांना संधी देऊन त्यांनी जावळी तालुक्यात पहिल्यांदा लाल दिवा आणण्याचे स्वप्न पूर्ण केले होते.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना वाई तालुक्यातील धोम धरण, जावळी तालुक्यातील कण्हेर धरण, भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार, सामाजिक क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचे योगदान दिले होते.
त्यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, गजानन भोसले, मोहनराव भोसले व कन्या सौ पद्मादेवी पाटील तसेच नात सुरभी भोसले आणि सुना नातवंड, परतुंड असा मोठा परिवार आहे. भुईंज येथून सायंकाळी अंत्यविधी काढण्यात येईल. तसेच त्यांच्या शेतातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.