कुडाळ:-श्री.छ.खा.भोसले यांच्या मताधिक्यासाठी जावळीकरांनी बांधला चंग.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
श्री.छ.खा.भोसले यांच्या मताधिक्यासाठी जावळीकरांनी बांधला चंग.
कुडाळ दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या साताऱ्या मध्ये जावळी खोऱ्यातील मावळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी परिश्रम घेतले होते. आज पावणे चार वर्षांनी पुन्हा एकदा जावळी खोऱ्यातील सर्व जाती धर्मातील मावळे हे मताधिक्य देण्याचा प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न करत आहेत . जावळीकरांनी कमळ चिन्हाला मताधिक्य देण्यासाठी चंग बांधल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत जावळी खोऱ्यातील दिडशे गावे व सुमार सव्वाशे वाड्या वस्तीमध्ये कमळ चिन्ह पोहोचवण्यासाठी भाजप व महायुतीचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. जावळी कर या निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, युवा नेते अमित दादा कदम, रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ .संपतराव कांबळे, सौरव शिंदे, अंकुश शिवणकर व भाजपचे श्री हरी गोळे व सयाजी शिंदे, गीता लोखंडे तसेच मनसे व शिवसेनेचे प्रवीण तरडे व पदाधिकारी प्रामाणिकपणाने मतदारांपर्यंत कमळ चिन्ह पोचवून महायुतीची जबाबदारी पार पाडत आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळीत जावळी खोऱ्यातील मावळ्यांना सध्या विश्वास व विकास या दोन गोष्टीवर निष्ठा ठेवून काम करावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तीन बार देशाचे पंतप्रधान होणार असून त्यांच्या नेतृत्वाखालील सातारच्या खासदारांना भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे मताधिक्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे. असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानेश्वर रांजणे यांनी व्यक्त केला आहे.
काटेवाडीचे मुख्यमंत्री होऊ शकतात. पण, काँग्रेस पक्षाने जावळीतील सुपुत्राला आतापर्यंत वापर करून घेतला गेला आहे. माजी आमदार भि. दा. भिलारे, बाबासाहेब आखाडकर, कृष्णराव तरडे, जी.जी. कदम, लालसिंगराव शिंदे, अशा अनेक मातब्बर मंडळींनी वारकरी संप्रदायाचा विचार दिला. आज त्याच जावळी खोऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारामध्ये एकजुटीने सहभागी होत आहेत .महायुतीतील घटक पक्षाचे एकनाथ ओंबळे, विजय शेलार ,जयदीप शिंदे , सुरेश पार्टे, मच्छिंद्र शिरसागर, राजू गोळे, मालोजीराव शिंदे, राजेश्री पवार, राजेंद्र फरांदे पाटील, अशी मातब्बर मंडळी सर्व जावळीकरांना विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणा राबवत आहेत.
आ. शिंदे हे भूमिपुत्र असले तरी त्यांचे राजकीय लक्ष कोरेगाव व माथाडी कामगार संघटनेच्या नवी मुंबई या क्षेत्रात अधिक आहे. दहा वर्षापासून जावळी तालुक्यातील त्यांच्या संपर्क तुटल्यामुळे पूर्वीसारखं त्यांचं वलय राहिलेले नाही.सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. जिल्हा बँकेत नोकर भरती करताना त्यांनी कोणाला प्राधान्य दिले? हे जावळीकरांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पराभवाची हॅट्रिक या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. ही काळा दगडावरील पांढरी रेघ आहे.
काही असंतुष्ट लोक हे स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी जावळीचे भूमिपुत्र असा उल्लेख करून आपल्या वाटेला काही पाकळ्या येतात का ? यासाठी मशाल हाती घेऊन न वाजणारी तुतारी फुंकत आहेत. त्यांचा आवाज शेजाऱ्याला सुद्धा ऐकू जात नाही. जावळीतील रिपब्लिकन पक्षाची स्वाभिमानी व सर्वधर्मसमभाव मानणारे कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाचे युती म्हणजेच खऱ्या अर्थाने राजकीय धर्म पाळत आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा – जावळी तालुक्यातील केलेला विकास व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जावळीकरांना दिलेला मायेचा ओलावा आजही कायम आहे. तसं पाहिलं तर कोयना व कण्हेर, महू- हातगेघर धरणामुळे जावळीकर विस्थापित झाली. भूमिपुत्र लोकप्रतिनिधी असूनही त्यांचे योग्य पुनर्वसन झाले नाही. याची खंत जावळी खोऱ्यातील धरणग्रस्त बोलू लागलेले आहेत. यातच सर्व काही आलेले आहे.
प्रत्येकाला निवडणुकीच्या काळामध्ये योग्यरीत्या सन्मान दिला जात आहे. पण काहींची राजकीय उंची कमी असूनही ते मोठ्या सदरा मागत आहे. हा सदरा अल्टर करण्याची ही त्यांची ताकद नाही त्यांचे नेते इमाने इतबारे महायुतीचा प्रचार करत आहे पण आपलं अस्तित्व वेगळं दाखवण्यासाठी ते व्यक्तिगत विरोध करत आहे पण त्यांच्या वस्तीत सुद्धा कमळ फुले आहे .हे त्या वसरत आहेत . याचा त्यांनी विचार करावा. असेही कुडाळ व सायगाव, करहर भागात प्रचार यंत्रणेत सामील झालेले रिपब्लिकन कार्यकर्ते तसेच महायुतीचे कार्यकर्ते शामराव पवार, सोन्या पवार,, राजेंद्र देशमुख, शरद शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.