आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-हरी नरके यांच्या सातारा भेटीची आस अधुरी ….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

हरी नरके यांच्या सातारा भेटीची आस अधुरी ….

सातारा दि: महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. हरी नरके यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र शोक काळा पसरली आहे. सातारला पुन्हा येण्याची त्यांची इच्छा होती. पण, त्यांच्या भेटीची आस अधुरी राहिली आहे.
याबाबत माहिती अशी की , जावळी तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सदाशिवभाऊ सकपाळ यांचे भाचे दिवंगत पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मोरे यांची जन्मभूमी असलेल्या सावली या ठिकाणी त्यांचे भव्य स्मारक व पुतळा उभा करण्यात आलेला आहे. गडचिरोली येथे नक्षलवादी विरोधात लढताना पोलीस उप निरीक्षक शशिकांत मोरे यांना वीरमरण आले होते.
यावेळी सावली गावातील कार्यक्रमात व्याख्याते म्हणून साहित्यिक श्री हरी नरके यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु दिनांक ११ मे २०२३ रोजी या कालावधीमध्ये ते महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश येथे नियोजित दौऱ्यावर गेल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला यांनी अशक्य झाले होते. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु ,पुन्हा नक्की भेटू असा संदेश त्यांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हनुमंतराव चवरे -पाटील यांना मोबाईलवर दिला होता. पण ही भेटीची आस अधुरी राहिली आहे.

हरी रामचंद्र नरके (१ जून, १९६३ ते ०९ ऑगस्ट २०२३) हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करतो.

यापूर्वी हरी नरके यांनी अनेकदा महात्मा फुले परिषदेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात दौरे केले होते .नायगाव ता. खंडाळा येथील शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाबाबत त्यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. त्यामुळेच नायगाव नगरी ही सावित्रीबाई नगरी झालेली आहे. हे सर्व श्रेय मंत्री छगन भुजबळ यांच्या समवेत श्री हरी नरके त्याचबरोबर आमदार मकरंद पाटील यांचे आहे .श्री हरी नरके यांना ज्येष्ठ विचारवंत म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत. परंतु अलिकडच्या जातीय सलोखा टिकविण्याच्या काळामध्ये व जेव्हा विचारवंतांची महाराष्ट्राला गरज होती. अशावेळी त्यांचे कायमचे निघून जाणे. खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात दलित सेनेची मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रेमाने जगताप- सायगावकर , शिवसेनेचे हणमंतराव चवरे- पाटील यांनी आदरांजली वाहिली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button