सातारा जिल्ह्यात १८२ गावे व ६०३ वाड्या ंमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जिल्ह्यात १८२ गावे व ६०३ वाड्या ंमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा.
सातारा दि: नैसर्गिक वरदान लाभलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये जावळी- महाबळेश्वरला पावसाळ्यात अतिवृष्टी तर कडक उन्हाळ्यात माण खटावला दुष्काळी परिस्थितीने लोक जिल्हा प्रशासनाच्या टँकरची वाट पाहत आहेत. अशा दोन्ही परिस्थितीला मुकाबला करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सक्षम बनली आहे. १८२ गावे व ६०३ वाड्या वस्तीला पिण्याचे पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे.
सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग व इतर महत्त्वाचे विभाग कार्यरत झालेले आहेत. अशा वेळेला दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या कर्तबगार महिला अधिकारी दुष्काळ निवारण करण्यासाठी व दुष्काळी भागातील प्रत्येक नागरिकांना पिण्याचे पाणीपुरवठा सुरळीत व्हावा. यासाठी परिश्रम घेत आहेत.
सध्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ६५ गाव गावे व ४०१ वाड्या वस्तीला ८४ टँकर. खटाव तालुक्यातील ४६ गावे व १०७ वाड्यावर ३६ टँकर, फलटण तालुक्यातील ३४ गावे व ८८ वाड्यावर २७ टँकर, कोरेगाव २७ गावांना २५ टँकर व खंडाळा तालुक्यातील १ गावाला १ टँकर, वाई तालुक्यातील ३ गावे व ३ वाडी टँकरच्या ५ फेऱ्या.. पाटण तालुक्यातील १ एक गाव व ४ वाड्यावस्तीना चार टँकर व कराड तालुक्यातील पाच गावे यांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण टँकरची संख्या १८४ असून महाबळेश्वर, जावळी व सातारा तालुक्यात अद्यापही पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केलेली नाही. सध्या १७० पिण्याच्या पाण्याचे टँकर माण तालुक्यातील पिंगळी, आंधळी, ढाकणी सोकासन, गोंदवले, मलवडी, दहिवडी व खटाव तालुक्यातील विसापूर, शिरसवडी, मायणी, मासुरणे, बनपुरी, फलटण तालुक्यातील फलटण नगरपरिषद, पाडेगाव जलशुद्धी केंद्र, लोणंद ,कोरेगाव तालुक्यातील करंजखोप ,आसनगाव, वडूथ ,सातारा रोड, खंडाळा- वाई तालुक्यात खाजगी विहिरीतून आणि पाटण तालुक्यात मरळी सहकारी साखर कारखाना व कराड तालुक्यात सह्याद्री सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर आणि मलकापूर या ठिकाणाहून टँकर मध्ये पाणी भरले जात आहे. सध्या जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असून त्याचेही नियोजन केले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे जिल्हा प्रशासन त्या कामात व्यस्त आहे. परंतु, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन हे स्वतः सातारा जिल्ह्यात फिरून आढावा घेत आहेत. दुष्काळ निवारण व प्रत्येक नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असून काही ठिकाणी पेजलाच्या योजना यशस्वी झाल्यामुळे टँकरची संख्या घटली आहे. योग्य प्रमाणात जर पाऊस पडला तर भविष्यात टँकरची संख्या कमी होईल. त्याचबरोबर पेयजल योजना सुरू झाल्यानंतर दुष्काळी भागातही पिण्याच्या पाण्याची समस्या होणार नाही. त्यामुळे सातारा जिल्हा हा टँकर मुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दुष्काळ निवारण कार्यासोबतच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी मुनावळे तालुका जावळी या ठिकाणी जाऊन जनजागृती सुद्धा करत आहेत. त्याचे हे सर्वत्र कौतुक होत आहे.