सातारा:-संविधान रक्षणासाठी दलित नेते महायुतीच्या महा रॅलीत महासन्मानाने सामील…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
संविधान रक्षणासाठी दलित नेते महायुतीच्या महा रॅलीत महासन्मानाने सामील…
सातारा दि: महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी सध्या महायुतीचे सर्वच नेते प्रयत्न करत आहे परंतु काँग्रेस परिवार संविधानाची भीती दाखवून घराणेशाही लाजत आहे याला तीव्र विरोध करण्यासाठी व संविधान रक्षणासाठी देत नेते महायुतीच्या मारलीत महासंघ समील झाल्याचे चित्र
सातारा शहरात पाहण्यास मिळाले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खा. आठवले गट ) ज्येष्ठ नेते सुनील भालेराव व भाजप अनुसूचित जाती सेल सातारा जिल्हाध्यक्ष अमित भिसे या दोन्ही नेत्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांना मताधिक्याने निवडून देण्यासाठी व त्यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून हजारो भीमसैनिकांसोबत व महायुतीच्या घटक पक्ष कार्यकर्ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. सर्व उपस्थित तरुण कार्यकर्त्यांनी कडक उन्हाची परवा न करता ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सावलीचा निवारा शोधून त्या ठिकाणी त्यांना बसवण्यात आले. तसेच घोषणाबाजी करून श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी सर्व मागासवर्गीय बांधव विकासावर विश्वास ठेवून कार्यरत झालेले आहेत.
ही लढाई संविधान भक्कम करणाऱ्या भाजप व संविधानाची भीती दाखवून खराखुरा जातिवाद पसरवणाऱ्या काँग्रेस विरोधात असल्याचे भाकीत अनेकांनी व्यक्त केले आहे. सातारा जावळी पाटण कराड वाई महाबळेश्वर खंडाळा कोरेगाव व खटाव तालुक्यातील आलेल्या भीमसैनिकांनी संविधान वाचवण्यासाठी महायुती खंबीर आहे महायुती सोबत येणारे सर्व दलित नेते हे संविधान रक्षक म्हणून महायुतीमध्ये सामील झालेले आहेत त्यामुळे आता काँग्रेस प्रणित आघाडीला चिंता वाटू लागलेली आहे गांधी नेहरू घराण्याचे नाव सांगून मत मागण्याचे दिवस संपले असल्यामुळेच आता संविधानाची भीती दाखवली जात आहे असे सुनील भालेराव यांनी स्पष्ट केले वाड्या वस्तीमध्ये विकास पोहोचल्यामुळे खऱ्या अर्थाने विकास पर्व सुरू झालेले आहे असे श्री भिसे यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील प्रमुख अशा शेकडो कार्यकर्त्यांनी या महा रॅलीमध्ये सामील होऊन प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हा किमान १०० मतदारांपर्यंत कमळ चिन्ह पोचवण्यास यशस्वी झाला आहे. आता सात जून रोजी होणाऱ्या मतदानाने खरी सातारा जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी ठरणार आहे हे अधोरेखित झाले आहे. असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी तसेच भाजप अनुसूचित जाती सेलचे कार्यकर्ते निसंकोश पणाने सांगत आहेत.