अहमदनगर:-सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्या संकल्प पत्राचा आत्मा – राधाकृष्ण विखे पाटील.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्या संकल्प पत्राचा आत्मा – राधाकृष्ण विखे पाटील.
नगर, दिनांक १६
भाजपाचे संकल्प पत्र देशातील सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून, संकल्प पत्रातून जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ‘सबका साथ सबका विश्वास’ हा भाऊ भाजपांच्या संकल्प पत्राचा आत्मा असल्याचा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संकल्प पत्राची माहिती मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांना दिली. भाजपाच्या संकल्प पत्रासाठी देशातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत, यासाठी सूचना पाठविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देवून, संपूर्ण देशातून १६ लाख सूचना यासाठी प्राप्त झाल्या. नगर जिल्ह्यातूनही १० हजार सूचना संकल्प पत्रासाठी पाठविण्यात आल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
नागरिकांच्या सूचनांमधून तयार झालेल्या या संकल्प पत्रात भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंध पासून ते देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत. समृद्ध भारत, सुशासन, स्वस्थ भारत, शिक्षण, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांच्या विकासा बरोबरच इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून ना. विखे पाटील म्हणाले की, २०४७ सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीब यांना सहस्त्र करण्याचा संकल्प करण्यात आला असून, रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करतानाच स्टार्टअप योजनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भारताला प्रक्रिया उद्योगाचे हब बनवून प्रक्रिया उद्योग ग्रामीण अर्थकारणाचे ग्रोथ इंजिन ठरेल असे उद्दिषठ या संकल्प पत्रातून ठेवण्यात आले असून, संस्कृती आणि परंपरेची जोपासणा करतानाच मागील दहा वर्षा देशातील महिलांना संधीचे होते. आता भविष्यातील पाच वर्षे ही महिलांच्या भागीदारीचे असतील. याकरिता नारीशक्ती वंदना अधिनियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची मोठी उपलब्धी ठरली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
भाजपाच्या संकल्प पत्राच्या अनुषंगानेच लोकसभा मतदारसंघाचा वचननामाही लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून, जिल्ह्यात रोजगार निर्मिती, तीर्थक्षेत्र पर्यटन तसेच प्रलंबित पाणी योजनांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबू शेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखिल वारे आधी याप्रसंगी उपस्थित होते.