सातारा:-महायुतीच्या मेळाव्यात दोन्ही राजेंनी केला ऐक्यावर शिक्का मोर्तब.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
महायुतीच्या मेळाव्यात दोन्ही राजेंनी केला ऐक्यावर शिक्का मोर्तब.
सातारा दि: सातारा येथील महायुतीच्या महामेळाव्याच्या निमित्ताने साताऱ्याचे दोन्ही राजे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजांनी राजकीय दृष्ट्या मनोमिलन करावे. अशी उपस्थितांनी साद घातली. त्यामुळे या महामेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन दोन्ही राज्यांनी या पुढील सर्व निवडणुका ऐक्याच्या मनोमीलनातून लढवण्याचा निर्धार करून शिक्कामोर्तब केला. यामुळे खऱ्या अर्थाने या महायुतीच्या महामेळाव्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मिळाल्याचा आनंद दोन्ही राजे समर्थकांना झाला आहे
श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार महेश शिंदे, वसंतराव मानकुमरे ,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप कदम,शारदा जाधव, माधवी कदम गीतांजली कदम रंजना राऊत, गीता लोखंडे अर्चना देशमुख, मनोज घोरपडे रामचंद्र वेताळ, ज्ञानदेव रांजणे, सौरव शिंदे एकनाथ ओंबळे, नामदेव सावंत, चित्रलेखा माने कदम, नगरसेवक महेश कदम, एकनाथ ओंबळे, सुनील खत्री, ,सरिता इंदलकर, मधुकर यादव, विक्रम पवार, लालासाहेब पवार, फिरोज पठाण सतपाल फडतरे, सागर भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा महामेळावा झाला. विशेष बाब म्हणजे या महामेळाव्याला सर्वच राजकीय पक्षाचे समर्थक व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संतोष कणसे व प्रवीण धस्के यांनी सूत्रसंचालन केले तर राजू भोसले यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, कराड आणि वाई नंतर साताऱ्यातील हा तिसरा मेळावा आहे. महायुतीचे देशभरातील ४०० खासदार लोकसभेत जाणार आहे .त्यामध्ये सातारचा खासदार निश्चितच असणार आहे. महाराष्ट्रात ४५ पार करण्यास कोणती अडचण नाही. या मेळाव्याला सर्वांनी सर्वात अधिक लक्ष वेधून घेतले ते सातारचे माजी नगराध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक अशोक मोने, सातारा जिल्हा परिषद माजी पदाधिकारी व श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुनील काटकर, वसंतराव मानकुंबरे यांनी होय.. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही महाराज एकत्र येतात. हे आनंदाची गोष्ट आहे पण इतर वेळी मात्र आम्हाला एकमेकांच्या विरुद्ध लढावे लागते. त्यामुळे त्याचाही विचार झाला पाहिजे. तुमचे मनोमिलन होते पण इतर निवडणुकीमध्ये आम्हाला एकमेकांच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. या संघर्षामुळे खूप आमचे नुकसान झालेले आहे. हाच धागा पकडून दोन्ही राजेंनी यापुढे मनमेलन करण्याचा मानस व्यक्त केला.
आमदार शिवेंद्रसिंह राजे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत देशाचे भवितव्य ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व योजना राबवून सर्वांचे भले केलेले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचे मी नाव घोषित केले तर माझे नाव विधानसभेला मागे राहील. त्यामुळे पक्ष श्रेष्ठ पुढे जायचे नाही. अशी त्यांनी कोपरखळी मारली . अमावस्या असताना मी भाजपमध्ये प्रवेश केला खरं म्हणजे अमावस्या चांगली असून शंकराचा आशीर्वाद लाभतो आहे. आता बम बम भोले करूनच सर्वांनी प्रचार उतरले पाहिजे. यावेळी आमदार महेश शिंदे , धैर्यशील कदम, समृद्धी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले, तुम्ही मांडलेली भूमिका ही स्वाभाविक आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो व भान ठेवून बोलतो की, आता यापुढे अडचणी येणार नाहीत. आमच्या मध्ये मतभेद नाहीत. पण कार्यकर्त्यांनी सुद्धा आता आम्हाला साथ दिली पाहिजे. निवडणुकीपुरता हा संकुचित विचार नाही तर सातारा जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून देण्याशिवाय पर्याय नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. कुणीही विकासापासून वंचित राहणार नाही. कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती ही आदरणीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच झाली. पण ते काँग्रेसला करता आले नाही. सध्या जी काही साताऱ्यात धरण झालेले आहेत त्याचे खरे श्रेय हे शिवसेना-भाजप युती सरकारला आहे. साताऱ्या देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. फक्त गरिबी हटाव या फक्त घोषणा देऊन गरिबी हटली नाहीत तर ते अधिकच वाढलेली आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सुवर्णा पाटील यांनी आभार मानले.
————–&-&-&&—————–
चौकट -पालकमंत्री देसाई आपल्या भाषणात म्हणाले दोन्ही महाराज व आमदार महेश शिंदे आहेत. या तिघांनी काम केले असते. त्याच वेळेला खासदार उदयनराजे ग्रामीण ढगात म्हणाले तीन तिघाड कान बिघाड होते. त्यामुळे चौथा तुम्हाला घेतलेला आहे. यावेळी उपस्थित लोकांनी चांगली दाद दिली.
——————–