सातारा:-सातारा जि.प.स्व.यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय केंद्रात दहा वर्षाने दिव्यांगांसाठी रॅम्पचे काम सुरु.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जि.प. स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय केंद्रात दहा वर्षाने दिव्यांगांसाठी रॅम्पचे काम सुरु.
सातारा : स्व. यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सत्ता पोहोचवली. सातारा जिल्हा परिषदेमध्ये ठराव करुन स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह बांधण्यात आले. त्यानंतर तब्बल दहा वर्षाने दिव्यांग कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्त या सभागृहात जाण्यासाठी घाईगडबडीने सभागृहाच्या डाव्या बाजूला रॅम्पचे काम सुरु असल्याने जाहिराप्रमाणे गतिमान सरकार असल्याचे दिसून आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या जागेमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह बांधण्यात आले. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, अजितदादा पवार, रामराजे नाईक-निंबाळकर, उदयनराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कामाचे भूमिपूजन व उद्घाटन झाले. विशेष म्हणजे या सभागृहाच्या समोर सुशोभिकरणासाठी पाण्याचे कारंजे उभे करण्यात आले. आज त्याची दुरवस्था झाली असून त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जि. अहमदनगर, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, ता.जि. सातारा, कृषी विभाग यांच्यावतीने पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले होते. यासाठी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफल, हारतुरे व भोजन व्यवस्था करण्यात आली होती. परंतू स्व. चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला ताजा हार मिळू शकलेला नाही. कारंजासाठी बांधण्यात आलेले हौद रिकामे असून त्यामध्ये दगड व कचरा पडलेला आहे. शेवाळ्यामुळे पायर्यासुद्धा हिरव्या, काळ्या झाल्या आहेत. जर अशी अवस्था झाली असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने चिंतेची बाब ठरली आहे.
दिव्यांग बांधवांसाठी सोमवार दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी सातारा शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह या ठिकाणी दिव्यांगांचा मेळावा होणार असून माजी मंत्री आ. बच्चु कडू हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वीच घाईगडबडीने दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी रॅम्पचे कामकाज सुरु केले आहे.
शासकीय आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी पाच टक्के निधी हा राखीव असून जशापद्धतीने मागासवर्गीयांच्या निधीचा अपहार केला जातो, तशाच पद्धतीने दिव्यांगांचाही अनेक ठिकाणी पाच निधी दिव्यांगांसाठी न वापरता इतर ठिकाणी वापरण्याची परंपरा जिल्हा परिषदेमध्ये कायम आहे. दहा वर्षाने पुन्हा एकदा दिव्यांगांसाठी बहुद्देशीय सभागृहाच्या डाव्या बाजुला रॅम्पचे काम सुरु आहे. हे कोणत्या निधीतून खर्ची टाकण्यात आले, याचे नियोजन केले असून पूर्वी उद्धवा अजब तुझे सरकार, असे गीत होते. आता ट्रिपल इंजिनच्या सरकारकडे बघून गाडी बुला रही है, सिटी बजा रही है, अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.
दरम्यान, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी हार घालण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने लोकवर्गणी गोळा केल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू एकता आंदोलन, विश्व हिंदू परिषद व त्यांच्या विचारांवर वाहिलेल्या संघटना सढळ हस्ते मदत करतील, अशी आशा स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
——————&——————————-
चौकट ———
सातारा जिल्हा परिषदेची इमारत सध्या कमिशन व टक्केवारी निमित्त सुरू असल्याचा आरोप,,,
-सातारा जिल्हा परिषदेने देश पातळीवरती चांगले काम करून पुरस्काराही मिळवलेले आहेत पूर्वी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य आक्रमक व अभ्यासू व नीतिमत्ता राखून काम करणारे होते आज जिल्हा परिषदेची मुदत संपूनही निवडणुका होत नाहीत त्यामुळे एक हाती कारभार सुरू असून मोठ्या प्रमाणात कमिशन व टक्केवारी यामुळे सातारा जिल्हा परिषदेचे प्रत्येक वीट पोखरली गेलेली आहे ही चिंतेची बाब असून यातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह सुटलेले नाही असे काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
——————-
फोटो -स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाची झालेली दुरावस्था व दिव्यांगांसाठी बांधण्यात आलेला (छाया- अजित जगताप सातारा)