सातारा:-रक्तदान ही काळाची गरज – मनोजदादा घोरपडे.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

रक्तदान ही काळाची गरज – मनोजदादा घोरपडे.
सातारा, दि. 6 (रफिक शेख ):- फत्यापुर ता. सातारा येथे कै. पंकज भगवान घाडगे यांच्या स्मरणार्थ, छावा प्रतिष्ठान व बालाजी ब्लड बँक सातारा यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन कराड उत्तरचे नेते व खटाव माण साखर कारखान्याचे को चेअरमन मा. मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मा.चेतन मचले एपीआय बोरगाव पोलिस स्टेशन, डॉ.सातपुते, मा.पवार शाखाधिकारी आय डी बी आय, मा. समाधान घाडगे सरपंच, सचिन घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मा. मनोजदादा म्हणाले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण आपल्या मित्राच्या स्मरणार्थ चांगला उपक्रम राबविला आहे.रक्तदान ही काळाची गरज असुन असेच उपक्रम राबवत राहून समाजासाठी काम करत रहा.
यावेळी मा.मचले साहेब म्हणाले, गेली 25 वर्ष एक गाव एक गणपती संकल्पना आपण राबवत आहात .असेच शांततेत उत्सव साजरे करून प्रशासनास सहकार्य करा.
यावेळी मा. कारले सर,राहुल घाडगे, उदय घाडगे, अरुण घाडगे, विजय घाडगे, दत्ता पवार, अधिक घाडगे,विनोद घाडगे, रामचंद्र घाडगे ,संतोष जाधव, पोलिस पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन धनाजी घाडगे यांनी तर आभार नवनाथ कंठे यांनी केले.