सातारा:-सातारा जिल्ह्यात मविआ च्या मताधिक्यासाठी विचार विनिमय.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जिल्ह्यात मविआ च्या मताधिक्यासाठी विचार विनिमय.
सातारा दि: लोकसभा निवडणुकीची रणनीती दिवसेंदिवस बदलत आहे .महाविकास आघाडीने मात्र सातारा जिल्ह्यात रणनीती ठरवण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकी केंद्रबिंदू मानून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते स्वयंपूर्ण यशस्वी विचार विनिमय करीत आहेत. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये लोकशाहीला साजेस अशा पद्धतीने चर्चा करण्यात आली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, किसनवीर आबा, बाळासाहेब देसाई असा वारसा लाभलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी त्याचबरोबर मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज खऱ्या अर्थाने युगपुरुषांच्या विचारांची रंगपंचमी सुरू झालेली आहे. सर्वधर्मसमभावाचा नारा देऊन सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्याने निवडून आणण्याची ग्वाही सर्वच प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत .
प्रचारात चांगल्या पद्धतीने स्टार्टअप घेतल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे. त्यांना अद्यापही उमेदवार निश्चित करता येत नाही. विरोधकांनी इतर पक्षातून कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेतले . आता त्यांची मनधरणी करताना त्यांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस येत आहे. हाच मोठा महाविकास आघाडीचा विजय आहे.
विचाराची लढाई विचाराने केली जाते. त्यामध्ये निश्चितच यश मिळते. आज सामाजिक कार्यकर्त्यांनाही महायुतीच्या सत्तेतून आलेला अनुभव व सामान्य माणसांची झालेली फरफट याबाबत आता मतपेटीतूनच मतदारांनी जाब विचारायचं आहे. सध्या महाविकास आघाडीची तयारी पूर्ण झाली असून पुन्हा एकदा बैठक होऊन सातारा व माढा लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या शुभारंभ करण्यात येणार आहे.
महा विकास आघाडी सोबत अनेक घटक पक्ष सामील होत आहेत. कारण, ही लढाई म्हणजे धनशाही विरुद्ध लोकशाही असून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी आता आत्मीयतेने प्रचार यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचे सर्वत्र स्वागत होत आहे. सातारा जिल्ह्यातील लोकसभेचा निकाल हा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक ठरणार आहे. अशा शब्दात मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक कार्यकर्ते नेहमीच रस्त्यावर उतरतात. त्यांनी गेली पाच वर्षे महायुतीला जाब विचारला आहे. आता त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी व निष्ठावंत व प्रामाणिक शिवसैनिक यांची साथ मिळू लागलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मतदार सुद्धा आता योग्य तो निर्णय घेईल. असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांनी स्पष्ट केले.
सर्वश्री डॉक्टर सुरेश जाधव सुनिल माने, राजेंद्र शेलार ,नरेश देसाई, वर्षाताई देशपांडे, असलम तडसरकर, कॉम्रेड शरद जांभळे, राजकुमार पाटील, सचिन मोहिते, मकरंद बोडके मिनाज सय्यद एडवोकेट रवींद्र पवार स्वप्निल वाघमारे प्राची ताकतोडे यांनीही आक्रमकरीच्या मत व्यक्त केले
इत्यादी इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी हजर होते. समविचाराची सांगड घालून लवकरच वचननामा प्रसिद्ध करण्यात येईल. यामध्ये जे शक्य आहे तेवढेच आश्वासन देण्यात येणार आहे. कारण सध्या विरोधकांचा वचननामा म्हणजे चेष्टेचा विषय झालेला आहे. पंधरा लाख रुपये मुळीच मिळत नाहीत. पण १५० अंध भक्तांची कमेंट्स मात्र वाचायला मिळत आहे. अशी सोशल मीडियावर टीका सुरू झालेले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाने ही निवडणूक हाती घेतल्याचे दिसून येत आहे त्या तरुणांचे स्वागत करण्यात आले आहे.
————————&———————
फोटो -राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये साताऱ्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबत झालेली चर्चा (छाया- अजित जगताप, सातारा)