भुईंज:-किसन वीर सातारा साखर कारखान्याविरुद्ध शेतकऱ्यांची लेखी तक्रार.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
किसन वीर सातारा साखर कारखान्याविरुद्ध शेतकऱ्यांची लेखी तक्रार.
भुईंज दि:
गळीत हंगाम २०२०–२१ मधील ऊस बीले अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांनी भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखाना संचालक व प्रशासनाविरुद्ध शेतकरी संघटनेने फौजदारी स्वरूपाची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आक्रमक झाल्याने त्याचा परिणाम निवडणुकीच्या मतदानावर होईल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सातारा व जावळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मनोहर सणस, गुलाब पवार, संदीप निकम, प्रकाश जाधव, बाळासाहेब चव्हाण,शिवाजी जाधव यांनी ही लेखी तक्रार दाखल केली आहे. स्वर्गीय किसनवीर सातारा सहकारी साखर
कारखान्याला ऊस घातल्यावर तीन वर्षाच्या काळात कारखाना संचालक व प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही ऊस बिल न मिळाल्याने (शरद जोशी स्थापित) शेतकरी संघटनेने मा. साखर आयुक्त(पुणे), जिल्हाधिकारी, (सातारा) यांना आंदोलनातून निवेदने दिली होते. त्यानंतर महसूल वसुली कायद्या प्रमाणे शासनाकडून दिरंगाई होत असल्याने ह्या शेतकऱ्यांनी ऊस नियंत्रण आदेश — १९६६ व आवश्यक वस्तू अधिनियम — १९५५ मधील तरतुदीनुसार फौजदारी स्वरूपाची फिर्याद दिली आहे. सदरची फिर्यादी शेतकऱ्यांनीच केल्यामुळे आता शेतकरी विरुद्ध किसनवीर सहकारी साखर कारखाना संचालक व प्रशासन अशी रंगीत तालीम सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी केन अग्रो एनर्जी, रायगांव (पूर्वीचा डोंगराई साखर कारखाना), व बीड साखर कारखाना विरुद्ध अशीच तक्रार सांगली जिल्ह्यातील कडेगाव व पोलीस ठाण्यात केली आहे. त्याबाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही. असे असताना किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री काय निर्णय घेणार ? याकडे लक्ष लागलेले आहे.
मुंबई न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने बीड येथील साखर कारखान्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत कारखानदारांना शिक्षा फार्मावली आहे. इतकेच नाही तर ऊस घातलेपासून ऊस बिल देई पर्यंतच्या कालावधीचे द.सा.द.शे. १५ टक्के प्रमाणे व्याज देण्याचे आदेश केले आहेत.
ऊस नियंत्रण आदेश – १९६६ नुसार साखर कारखान्यानी ” ऊस दिल्यावर १४ दिवसात ऊसाची किंमत अदा केली पाहिजे. ऊस बिले वर्षांनूवर्षे न मिळाल्याने शेतकरी वेळेत कर्जे भरू शकत नाहीत. त्यामुळे थकबाकीदार बनून नवीन कर्ज मिळत नाही.तसेच वीजबिले, खते, पाणीपट्टी, उधारी न दिल्याने आर्थिक संकटात सापडतो.” असे निकालात नमूद केले आहे.
साखर कारखान्यांनी वेळेत ऊसाचे पैसे न देणे ही फसवणूक,पैशाचा गैरवापर, विश्वासघात असल्याचे” म्हणले आहे.
साखर कारखाने भ्रष्टाचार, अनागोंदी, राजकारण यामुळे अडचणीत येतात. यात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचा काहीही संबंध नसतो. राजकीय वरदहस्त, संबंधित शासकीय विभागांचे व कारखानदारांचे संगनमत यामुळे भ्रष्टाचाराला मदत मिळते. व ह्या सर्वात शेतकऱ्यांचा बळी दिला जातो.
वरील तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष बाळासो चव्हाण,उपप्रमुख प्रभाकर शेवते, सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी प्रयत्न केले आहेत. दरम्यान किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याची संबंधित कोणत्याही नेते अथवा व्यक्तीने शेतकऱ्यांना मतदान मागण्यासाठी आले तर त्यांना जाब विचारावा अन्यथा त्यांच्या विरोधात मतदान करून ताकद दाखवून द्यावी असे आवाहन श्री चव्हाण यांनी केले आहे.
———————————————
फोटो -किसनवीर सातारा साखर कारखाना इमारत