वाई:- “ स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांचे संस्थेवर व महाविद्यालयावर नीतांत प्रेम होते म्हणून त्यांच्याकडे माऊलीच्या रूपात मी पहातो….” – सीए.उदयभाई गुजर.
पत्रकार वैष्णवी शिंद

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंद
RPS STAR NEWS
वाई : दि.१८
“ स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांचे संस्थेवर व महाविद्यालयावर नीतांत प्रेम होते म्हणून त्यांच्याकडे माऊलीच्या रूपात मी पहातो….” – सीए.उदयभाई गुजर.
” स्व.भांऊनी जनता शिक्षण संस्थेवर आणि किसन वीर महाविद्यालयावर प्रंचड प्रेम केलं म्हणून मी त्यांना माऊलीच्या रूपात पाहातो. भाऊंना शिक्षणांबद्दल अपार प्रेम असल्यामुळेच संस्थेची व महाविद्यालयाची प्रगती झाली म्हणून भाऊंना किसन वीर महाविद्यालयाचे हे संकूल कधीच विसरणार नाही. सतत आनंदी, कडक स्वभाव,प्रंचडशिस्त,निटनेटकेपणा,तीक्ष्ण नजर,पारदर्शी कारभार,नैतिकता,निःस्वार्थ सेवाभाव, असे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते.त्यामुळे भाऊंना मी गुरुस्थानी ठेवलेलं आहे.” असे प्रतिपादन सीए उदयभाई गुजर यांनी केले. येथील किसन महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या सहाव्या मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे संचालक श्री सुरेश यादव,सचिव डॉ.जयवंत चौधरी, उपप्राचार्य डॉ. हनुमंतराव कणसे, प्रा.भिमराव पटकुरे,डॉ.चंद्रकांत कांबळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ.अंबादास सकट, किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे,पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव तसेच राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. रमेश डुबल, डॉ. रमेश वैद्य, डॉ.एकनाथ भालेराव, डॉ. रविंद्र बकरे, श्री. विवेक सुपेकर, श्री. गणेश चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.
श्री. उदयभाई गुजर पुढे म्हणाले की, ” भाऊ नेहमी आनंदी जगायचे. ‘कायम तुम्ही आनंदी रहा तरच तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक उर्जा निर्माण होईल’ असे त्यांचे मत होते. शैक्षणिक संस्था आदर्शवत कशी चालवावी? याचे उत्तम उदाहरण म्हणून जनता शिक्षण संस्था व किसन वीर महाविद्यालयाकडे पाहिले जाते. याचे संपूर्ण श्रेय भाऊंकडे जाते. स्व.भाऊंनी संस्थेचा कारभार dx अतिशय पारदर्शीपणे केला म्हणूनच जनता शिक्षण संस्थेविषयी महाराष्ट्राच्या शैक्षणिक वातावरणात आदरयुक्त भावना दिसून येते. महाराष्ट्रातील आत्महात्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची मोफत शिक्षणाची सोय करुन स्व.भाऊंनी आपल्यासमोर एक आदर्श घालून दिला आहे.” आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले की, “स्व.भाऊंनी स्वतःच्या जीवनामधून जो आदर्श समाजासमोर ठेवला आहे, त्यामधून आपणाला खूप काही घेण्यासारखं आहे. भाऊंनी माणसं टिकवली म्हणून जनता शिक्षण संस्थेची व महाविद्यालयाची प्रगती झाली. भाऊ कडक स्वभावाचे होते म्हणून त्यांनी तत्वांशी कधी तडजोड केली नाही.भाऊंच्या विचारांची कास धरून; तत्त्वनिष्ठ विचारांचा वारस होण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत. भाऊंचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा उद्देश ठेवून; त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या व्याख्यानमालांचं आयोजन केलेले आहे आणि ते सार्थक होईल अशी आशा मला आहे.”
याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.जयवंत चौधरी यानीही स्व.भाऊंच्या आठवणीना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. प्रतापराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.अंबादास सकट यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बाळासाहेब कोकरे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.