वाई:-विद्यार्थ्यांनी ताण तणाव विरहित परीक्षेचा टप्पा पार पाडा – अशोकराव सरकाळे.
सह संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह संपादक अशितोष चव्हाण
वाई- विद्यार्थ्यांनी ताण तणाव विरहित परीक्षेचा टप्पा पार पाडा – अशोकराव सरकाळे.
नुकत्याच वाई येथील स्वामी विवेकानंद गर्ल्स हायस्कूल येथे एस.एस.सी परीक्षा शुभचिंतन आणि वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी परीक्षेचा टप्पा पार करताना कुठलीही गडबड किंवा गोंधळ न करता परीक्षेला जावे. ताण तणावामुळे मनाचा गोंधळ उडुन सोपा असणारा पेपर अवघड गेल्यासारखा वाटतो त्यामुळे परीक्षेच्या काळात कुठलाही ताणतणाव न घेता परीक्षेला आनंदाने सामोरे जावे. असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सरकाळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. रेखा ठोंबरे यांनी व्यक्त करताना कॉपी विरहित परीक्षा पार पडली पाहिजे आणि भरपूर मेहनत घेवुन विद्यार्थिनींनी शाळेचे नाव उज्वल केले पाहिजे असे सांगितले.
या वेळी सामाजिक कार्यकर्त्या उषा ढवण, शोभाताई रोकडे, प्राजक्ता वरे, देवदत्त धेंडे सर यांनी परीक्षा संदर्भात व जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी अमूल्य मार्गदर्शन केले.
विद्यार्थीनींनी रांगोळ्या काढून, पारंपरिक पोशाख परिधान करून आजच्या दिवशी हजेरी लावली. हिना शेख, अचल कांबळे, साक्षी महांगडे, अन्नपूर्णा पुजारी, जान्हवी शेलार, श्रद्धा भिसे, जिया मांढरे, वैष्णवी वाडकर, सिद्धी गायकवाड, अनुष्का वरे या विद्यार्थिनींनी सुद्धा सर्व पाहुणे, शाळा आणि शिक्षक यांविषयी कृतज्ञता पूर्वक मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला धेंडे यांनी केले व आभार सौ. चव्हाण यांनी मानले.