सातारा:-अंबुज चित्रपटाने प्रथमच मातंग समाजाचा इतिहास पडद्यावर…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
अंबुज चित्रपटाने प्रथमच मातंग समाजाचा इतिहास पडद्यावर…..
सातारा दि: महाराष्ट्रातील लढाऊ समाज म्हणून मातंग समाजाकडे पाहिले जाते. समाजकारण ,राजकारण, शैक्षणिक ,सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा व कलाक्षेत्रात आपल्या कलागुणांना संधी मिळाली की त्याचे सोनं करणारे अनेक मातंग समाजात हिरेरत्ने तयार झालेले आहेत. त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी अंबुज हा मराठी चित्रपट पाहणे म्हणजे मातंग समाजाचा इतिहास पडद्यावर पाहणे असाच आहे.
निर्माते नरेंद्र गायकवाड व सह निर्माता नितीन माने यांच्या संकल्पनेतून हा अंबुज चित्रपट तयार करून प्रेक्षकांच्या न्यायालयात निकालासाठी सादर केलेला आहे. मातंग समाजाची अस्मिता म्हणजे वीर लहुजी साळवे, मुक्ताई साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा असंख्य लोकांनी प्रबोधनात्मक काम केले आहे. त्या समाजातील इतिहास युवा पिढीला माहीत असावे यासाठी कलावंत रामचंद्र धुमाळ, आर एन गायकवाड, मारुती पुराणिक व असंख्य कलावंतांनी परिश्रम करून आपली कला सादर करताना जीव ओतून काम केलेला आहे. त्याची सर्व समाज नक्कीच कदर करेल. असा विश्वास निर्माते नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला .
सदर अंबुज चित्रपटाचे चित्रीकरण हे उघडेवाडी, बेंबळ जिल्हा सोलापूर व पुणे जिल्ह्यातील इंदापूर या ग्रामीण भागात ग्रामीण कलावंतांना घेऊन चित्रीकरण केलेले आहे. स्वच्छतेचा संदेश देणारे बहुजनांचे नेते संत गाडगेबाबा जयंती निमित्त दिनांक २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा ऐतिहासिक व रसिकांच्या पसंतीला उतरणारा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सातारा शहरातील सेवन स्टार या ठिकाणी हा चित्रपट नक्कीच पाहतील असा विश्वास आनंदा साठे, शेखर पाटोळे व दत्ता केंगारे यांनी व्यक्त केला आहे.
चित्रपटाची कथा छाया व पटकथा नारायण गायकवाड संगीत गांधी स्टुडिओ सातारा व सद दिग्दर्शक माऊली पुराने यांचे आहे .सर्वच बाजूने एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून त्याचा अनेक मान्यवरांनी गौरव केलेला आहे. आपल्या मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक चित्रपटांनी इतिहास घडवला आहे मराठी चित्रपटांमध्ये ही लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतून अनेक चित्रपट निर्माण झालेले आहेत. पण प्रत्यक्षात अंबुज हा चित्रपट हा खऱ्या अर्थाने प्रबोधनात्मक चित्रपट असून प्रेक्षकांनी थेटर मध्ये येऊन या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा. अशी विनंती जेष्ठ कलावंत अमर गायकवाड, सातारचे माजी उपनगराध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश बडेकर, किशोर गालफाडे,मनोज घाडगे तसेच शाहीर फरांदे आदी मान्यवरांनी केली आहे .
मांग किंवा मातंग हा भारतातील एक अनुसुचित समाविष्ट असलेला समुह आहे. या जाती समुहाला मध्ययुगीन कालात बहिष्कृत (अस्प्रश्य) मानले गेले होते. या जातसमुहाची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. २०११ मध्ये, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे. आज ती ४०लाख आसपास आहे.मातंग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसुचित जातीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील ११ राज्यात मातंग समुदायाला अनुसुचित जाती मध्ये समाविष्ठ केले आहे.
मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता.या समाजाचा भारताला स्वातंत्र मिळवुन देण्यात खुप मोटा वाटा आहे.या समाजाचे काही क्रांतिकारी होवुन गेले परंतु भारतातल्या जातिय वादांच्या भोवर्यात त्यांचा
इतिहास लिहीला गेला नाही. छत्रपती शिवरायांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे ‘सर्जेराव मांग’ व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने ‘येल्या मांग’ होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. अंबुज हे कमळाला समानार्थी शब्द आहे. चिखलात कमळ… तस मांगात बळ….असे सातारा जिल्ह्यातील युवा साहित्यिक आप्पासाहेब जगताप – सायगाव कर नमूद करीत आहेत.
——-&&&&————————–
फोटो – अंबुज मराठी चित्रपटाची माहिती देताना निर्माते नरेंद्र गायकवाड व मान्यवर मंडळी (छाया- निनाद जगताप सातारा)