फलटण:-भारतीय जनता पार्टी तर्फे दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी संवाद दौरा संपन्न.
पत्रकार समीर खान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार समीर खान पठाण फलटण तालुका उपाध्यक्ष
भारतीय जनता पार्टी तर्फे दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी संवाद दौरा संपन्न.
फलटण प्रतिनिधी / समीर पठाण
खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नाने पिढ्यानपिढ्या अडकलेला ५७ गावांचा निरा देवघरचा प्रश्न कायमचा मार्गी लावल्याबद्दल दुष्काळी भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी संवाद दौरा कार्यक्रम संपन्न करण्यांत आला होता. त्यावेळी कुरवली बुद्रूक , राजुरी, दत्तनगर भागातील सामाजिक , राजकीय , तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी या भागामध्ये न येता. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामाची पावती सांगण्यासाठी या ठिकाणी संवाद दौरा आयोजित केला आहे. आपण केलेली कामे ही गावातील तरूण , शेतकरी वर्ग यांना समजले पाहिजे या तळमळीने आम्ही या ठिकाणी आलो आहे.
मा. प्रल्हादराव साळुंखे पाटील ( ज्येष्ठ नेते )यांनी आपले मनोगत व्यक्त केले फलटण पुर्व भागातील जनतेने २३ तारीखेला काळज येथे निरा देवघरचा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मेळावेचे आयोजन केले आहे. तरी फलटण पुर्व भागातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
मा. विश्वासराव भोसले ( प्रभारी फलटण विधानसभा ) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी हिते राजकीय भाष्य करण्यासाठी आलो नाही. तुमच्या मनातील अडचणी सोडविण्यासाठी आलो आहे . कुरवली पंचक्रोशीतील भाग हा काही दिवसांत च पाणीमय होणार आहे.
यावेळी मा. जयकुमार शिंदे ( सरचिटणीस, सातारा जिल्हा भाजपा) मा.अॅड . नरसिंह कदम (मार्गदर्शक) नितिन कर्णे , धनाजी गावडे, कुलदीप गावडे, रामभाऊ केंगार , विष्णू सुळ ,डाॅ . राहुल गावडे , संगीता नलवडे, अशोक आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.