सातारा:-ओ.बी.सी.मतदारांना पर्याय दिल्यास मते मिळतील, साताऱ्यात निर्धार….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
ओ.बी.सी.मतदारांना पर्याय दिल्यास मते मिळतील, साताऱ्यात निर्धार….
सातारा दिनांक सातारा जिल्ह्यामध्ये इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी बांधवांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे पाडळे , नेताजी गुरव, भरत लोकरे काम करीत आहेत परंतु, ओ बी सी तरुण वर्ग ओ बी सी म्हणून एकत्र येत नाहीत. मत्ताबर मंडळी पदे घेतात पण, सहभागी होत नाहीत. अशा वेळेला ओबीसी नेत्यांनी पर्याय दिल्यास ओबीसी मतदार मत देखील असा निर्धार सातारा येथील ओ बी सी बहुजन पार्टीच्या जाहीर मेळाव्यात अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
सातारा येथील सौभाग्य मंगल कार्यालयात ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाघा टक प्रा. दिगंबर लोहार प्रमुख पाहुणे अमोल आलेकर, जे.डी. तांडेल, महेश भागवत, सुरेश कोरडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा ओ.बी.सी. समाजाचा मेळावा संपन्न झाला.
मराठा समाजाला आरक्षण देताना राज्य सरकारने ओबीसी बांधवांच्या
आरक्षणाला धक्का लावणार नाही. असे सांगितले. पण मराठा समाजासाठी पायघड्या घालण्यात आल्या. आता राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी ओ. बी. सी. बहुजन पार्टी हा राजकीय पक्ष दोन महिन्यापूर्वी स्थापन केला. राष्ट्रीय अध्यक्ष व ओ.बी.सीं.चे भाग्यविधाते प्रकाश आण्णा शेडगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ओ.बी.सी. बहुजन पार्टीने उमेदवार उभे करून आपले अस्तित्व दाखवले.
सातारा, सांगली, बारामती येथे बलाढ्य व प्रस्थापित मंडळी पुढे उभे राहणे अशक्य झाले असले तरी मराठा समाजाला मतदान करायचे नाही. पर्याय निर्माण केल्याने मते मिळाली आहेत. ओ.बी. सी. कार्यकर्ते सार्वजनिक कार्यक्रम व प्रचार निमित्त ओपन होत नाहीत पण, बरोबर राहत नाहीत. असा अनुभव सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश कोरडे यांनी सांगितले. त्यांना वेगळ्या अनुभव आला. काहींनी उघडपणे काम केले. कैलास जमदाडे, प्रदीप बोराटे, भरत लोकरे यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
वाई तालुक्यातील धडाडीचे ओ.बी.सी. कार्यकर्ते यांच्या घरी जावून प्रस्थापित उमेदवारांनी चहा पान घेतला. ओ.बी.सी. उमेदवाराला मतदान करण्यापासून प्रस्थापितांनी त्यांना रोखून ठेवले. दोन लाख मतदार असलेल्या विशिष्ठ समाज्याने फतवा काढून बी. जे. पी. विरोधात मतदान केले. त्यास धरतीवरती आता सार्वजनिक निवडणुकीत उघडपणे काम करणारा ओ. बी. सी. समाजातील प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ता हवा आहे.
प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी साडे तीनशे जातींच्या ओ. बी. सी. ने एकजूट करावी. निवडणुकीत विजय मिळाला तर सर्व ओ. बी. सी .एकत्र येतील. सातारा लोकसभेच्या निवडणुकीत बारा लाख मध्ये सहा लाख ओ बी सी मतदार आहेत.आपल्यासाठी आपला माणूस काम करेल. 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाने सत्ताधारी झाले पाहिजे. असा सूर या मेळाव्यात दिसून आला.
मराठा समाजाने अनेक लोकसभेच्या जागेवर ओ. बी. सी. उमेदवार यांना न घाबरता विरोध केला. ओ. बी. सी. यांनी सुद्धा ओ. बी. सी. समाजाला मतदान केले पाहिजे. यामध्ये जातीयवाद नाही. तर आपला अधिकार कायम ठेवण्यासाठी हा लढा आहे. आता तरी ओ. बी. सी. समाजाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्या प्रमाणे पुढे गेले पाहिजे. असा ठाम विश्वास अमोल आलेकर यांनी आपल्या तडाकेबंद भाषणात उदाहरणासह स्पष्टीकरण दिले.
आरक्षण लाभार्थी उमेदवाराला आरक्षण लाभार्थी मतदारांनी मतदान करावे. तरच अधिकार शाबूत राहतील. असे प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यात बहुजन समाजाचे जीवा महाले, शिवा काशिद, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे या बहुजन शूरवीरांसह वासुदेव, पिंगळा, कुरमुद्या जोशी यांनीही हातभार लावल्यामुळे स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांना वाचविण्यासाठी ओ. बी. सी .पुढे आले आहेत. त्यांना इतरांनीही साथ द्यावी. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या ओबीसी बहुजन पार्टीच्या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनीही मौलिक मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत ओ.बी.सी. समाजाने जनजागृती करण्यासाठी एका विचाराने पुढाकार घेतला पाहिजे. ही लढाई यशस्वी करण्यास कोणती ही अडचण नाही असाही दावा केला. या ओबीसी बहुजन पार्टीच्या मेळाव्याला प्रकाश फरांदे, नवरंग कुंभार ,कैलास जमदाडे, शरद गुरव अडवोकेट रामदास सपकाळ सुधाकर ताटे प्रदीप बोराटे ,रामचंद्र बनवडे, जयसिंग कुंभार, प्रमोद शिरसागर व मारुती जानकर, दिलीप सावंत, अनिल वीर, समाधान जावळे, सीमा जावळे व अनेक ओ.बी.सी. व मागासवर्गीय कार्यकर्ते उपस्थित होते.