खटाव:-( गोरेगाव वांगी):-गोरेगांव वांगी ता.खटाव येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ व शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
गोरेगांव वांगी ता.खटाव येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ व शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजना गरजू नागरिकां पर्यंत पोचवण्यासाठी केलेला हा कार्यक्रम अभिनंदनीय आहे. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.श्री अजयकुमार मिश्रा साहेब यांच्याहस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला तसेच लाभार्थ्याची संवाद साधण्यात आला.सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने पुढं टाकलेल एक पाऊल आहे.
यावेळी नागरिकांना पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, सुरक्षा विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, पी एम किसान योजना, जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना बचत गटांना अर्थसहाय्य, बांधकाम कामगार योजना, संजय गांधी निराधार योजना, आदी विविध योजनांच्या लाभासह माहिती देण्याबरोबर अर्ज भरून घेतले गेले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, कराड उत्तर निवडणूक प्रभारी मनोज घोरपडे, किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई माने, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सरचिटणीस सागर शिवदास, सरचिटणीस सुनील बापू शिंदे, सरचिटणीस जयकुमार शिंदे, मठाधिपती विठ्ठल महाराज, वेताळ भक्त दादा महाराज, अध्यक्ष भीमराव काका पाटील, अध्यक्ष शंकर काका शेजवळ, युवा उद्योजक सत्वशील कदम, युवा नेते विक्रमबाबा कदम, मा.पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज नाना निकम, मा.पं.स सदस्य दीपक लिमकर, सरपंच शुभांगी जाधव, मुख्याध्यापक सुनील सावंत, शासकीय अधिकारी तसेच गोरेगांव वांगी गावातील ग्रामस्थ महिला व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.