मायणी:-मायणी येथील साहसीवीर पोहोचले वाघा बॉर्डरवर.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी येथील साहसीवीर पोहोचले वाघा बॉर्डरवर.
मायणी प्रतिनिधी—मायणी तालुका खटाव येथील सह्याद्री ट्रेकर्स व सायकलिंग ग्रुपचा विजय वरुडे, शिवाजी कणसे किरण माने अंबरीश जोशी विनोद दीक्षित यांनी मायनी ते भारत पाकिस्तानच्या अटारी अर्थात वाघा बॉर्डर पर्यंत साहसी सायकल प्रवास करून 23 80 किलोमीटर प्रवास केल्यानंतर मायणीच्या चांदणी चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले मायणीत सह्याद्री ट्रेकर्स व सायकलींचा ग्रुप आहे आजवर या ग्रुपने 125 गड किल्ले सर केले आहेत सात सहा सी सायकल यात्रा पूर्ण केल्या आहेत मायणी ते गणपतीपुळे, मायनी ते कन्याकुमारी मायनी ते द्वारका मायनी ते नेपाळ काठमांडू या सायकल सफारी पूर्ण केलेल्या आहेत 2017 पासून सहासी प्रवाशांनी आरंभ केला असून लेक वाचवा देश वाचवा, सेंद्रिय अन्न सात्विक अन्न, ते छोटे कुटुंब सुखी कुटुंब, अशक्य ते काय, जल है तो कल है माझी माती माझा देश, या देशभक्तीपर विषयांचा प्रचार आणि प्रसार केला आहे या प्रवासात मायणी तेव्हा वाघा बॉर्डर पुढे पंजाब, हरियाणा ,मध्य प्रदेश ,महाराष्ट्र असा सायकल प्रवास केला या प्रवासात युवकांनी विविध भागातील संस्कृती आहार विविध माहितीचे संकलन केले या सायकल वीरांनी तरुण भारतचे बोलताना सांगितले की आम्ही पाच जणांनी मिळून प्रवास केला प्रवास होईपर्यंत आमच्या मनात शंका कुशंका होत्या परंतु आमचा प्रवास निर्विघ्न व सुखरूप पार पडला मोठ्या अडचणी आल्या नाहीत आणि छोट्या अडचणींना आम्ही भीक घालत नाही असे सांगितले असे विजय वरुडे यांनी सांगितले या प्रवासात युवकांनी विविध भागातील संस्कृती, आहार विविध माहितींचे संकलन केली माहिती आल्यावर ग्रामस्थांनी फटाके फोडत भव्य सत्कार केला.