वडूज:-“A TRIBUTE TO MY FATHER’S STRUGGLE FOR LIFE” Written by HARISH GORE SIR.
प्रतिनिधी मुन्ना पटेल खटाव:-7249654507

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
“A TRIBUTE TO MY FATHER’S STRUGGLE FOR LIFE”
Written by HARISH GORE SIR
या पुस्तकाचे लेखक यांना भेट व त्यांची मुलाखत
December 1 ,2022
दादासाहेब जोतिराम गोडसे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, वडुज.
विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कॉलेज मधील इंग्लिश डिपार्टमेंट मधील प्राध्यापकांच्या मनात असे आले की विद्यार्थी नेहमी पुस्तक वाचतात,परंतु त्यांना लेखकांना भेटायला मिळत नाही. लेखकांना भेटाव व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी Prof.SHIVAKUMAR AGRAWAL SIR . आणि DR.SACHIN KAMBALE SIR. यांनी खूप प्रयत्न करून हा कार्यक्रम पार पाडला.
“A TRIBUTE TO MY FATHER’S STRUGGLE FOR LIFE” या पुस्तकाचे जनक “HARISH GORE” सर तसेच अनेक मराठी साहित्य लिहिणारे “SUHAS PAWAR” सर हेही उपस्थित होते.
“A TRIBUTE TO MY FATHER’S STRUGGLE FOR LIFE” या पुस्तकाची निर्मिती कशी झाली , हे पुस्तक कश्या प्रकारे प्रेरणादायी आहे ,त्यांच्या वडिलांच्या जीवनातील खडतर प्रवास कसा होता इ. माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर त्यांची विद्यालयातील विद्यार्थ्यांनद्वारे मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी असे सांगितले की वडिलांच्या निधनानंतर त्यांची मानसिकता फार विचित्र झाली होती. ते रात्र-रात्रभर जागत असे,त्यांना झोप येत न्हवती. अन् त्यांचं वडिलांबद्दल इतकं प्रेम होत की त्यांनी विचार केला आपण एक पुस्तक लिहायचं.त्यांनी हे पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिलेले आहे. परंतु त्यांनी सुरवातीला हा पुस्तक मराठी मधून लिहून काढला होता .पुस्तक लिहीत असताना त्यांच्यावर अनेकांनी टीका केल्या.होत्या परंतु ते थांबले नाहीत व त्यांनी 165 पानांचे पुस्तक लिहिले.
“हा जीवनचरित्र वाचकांना मार्गदर्शन करून त्यांना भारतातील चांगले नागरिक बनवण्यासाठी उद्देशून आहे. बालमजूर – शेतकऱ्याचा नोकर म्हणून त्यांना कष्ट करावे लागले. काही असामान्य संकटांना सामोरे जावे लागले, तरीही मानवी मूल्यांनी परिपूर्ण, सज्जन जीवन जगले. मेहनत करून जमीन खरेदी करून स्वतःचे घर बांधण्याची प्रगती केली. नंतर त्याने एका गुलामाचे जीवन सोडून टेलरची नोकरी शिकण्यास निघाला. त्यांच्या निष्ठेने आणि चिकाटीने त्यांना वाचन, लेखन, प्राथमिक पातळीचे गणित विषयाचे ज्ञान मिळवता आले. हार्मोनियम वाजवायलाही शिकले आणि भजन गाण्यात सक्रिय भाग घेतला. सुमारे पन्नासव्या वर्षी कॅन्सर ने त्याच्यावर हल्ला केला, तरीही न सांगितलेली दुःख, वेदना, कष्ट सहन केले. त्याच्या मुलाने त्याला आदर्श मुलाप्रमाणे कसे संगोपन केले, सेवा केली आणि वागवले हे वर्णन तपशीलवार सांगितले आहे. कॅन्सरलाही वडिलांच्या निधनासाठी पंधरा वर्षे चांगली वाट पहावी लागली. लेखकाने बालमजुरी, वृद्धावस्था यांच्या समस्या, निरक्षरता, सामाजिक दुष्टता, गैरव्यवहार या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला आहे आणि त्यावरील उपायही सांगितले आहे.”
सुमारे त्यांच्या 2000पुस्तकांची विक्री झाली आहे.सुरवातीला हे पुस्तक काही ऑनलाईन साईट्स वर होते व नंतर हे प्रकाशित करण्यात आले.या पुस्तकाची किंमत 235 रूपये आहे.