खटाव:-गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णयाला स्थगिती देण्यात यावी.
प्रतिनिधी नितीन कुलकर्णी:-9921778417

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
हेडिंग
गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णयाला स्थगिती देण्यात यावी.
पंचवीस तारखेला मुख्यमंत्र्यांना घालणार घेराव.
वडूज
कोर्टाच्या आदेशानुसार गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यावर सरकारने तातडीने पुनर याचिका दाखल करून स्थगिती आनावी या मागणीचे निवेदन खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले. आहे.चोराडे ता.खटाव या गावात गायरान जमीन 1960 पासुन ते 2022, पर्यंत साडेतीनशेच्या वर घरे वसली आहेत,त्या ठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक वास्तव्यास आहेत, ग्रामपंचायत व विज वितरणचे कर नियमित भरत आहेत.त्यामुळे 16 फेब्रुवारी 2018 च्या नियमाची अंमलबजावणी कायम करावीत,या जागेचे शुल्क आकारुन अतिक्रमणे नियमित करावीत, आणि गोरगरीब लोकांचे सौसांर उध्वस्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
यावेळी दलित महासंघाचे मच्छिंद्र सकटे म्हणाले पंचवीस तारखेला मुख्यमंत्री कराड मध्ये येत आहेत त्यांना घेराव घालुन गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढु नका असे निवेदन आम्ही देणार आहोत.
यावेळी दलित महासंघाचे पदाधिकारी व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.