साताऱ्यात निवासी उपजिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी एका पायावर झाले तयार….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
साताऱ्यात निवासी उपजिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी एका पायावर झाले तयार….
सातारा दि: सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीची निर्विवाद सत्ता असल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सत्ताधारी पक्षाची मर्जी सांभाळावी लागते. काल साताऱ्यात विश्व हिंदू परिषदेने पश्चिम बंगालातील हिंदूंच्या संरक्षणासाठी एक निवेदन तयार केले. हे निवेदन स्वीकारण्यासाठी सातारचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील एका पायावर तयार झाले. वास्तविक पाहता सुट्टीच्या दिवशी त्यांच्या पायाला गंभीर जखम असून सुद्धा ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरशः लगडतच आले त्यांनी निवेदन स्वीकारून कर्तव्य बजावले आहे..
पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर वर अत्याचार होत असून तात्काळ पश्चिम बंगाल राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी. या मागणीसाठी आज शनिवार दिनांक दुपारी विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. या ठिकाणी त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही काळ घोषणाबाजी केली. तसेच निवेदन देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. याची ते वाट पाहत होते.
अखेर अर्ध्या तासानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री पाटील हे चार चाकी वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. त्यांच्या पायाची दुखापत पाहून आंदोलकांनी या ठिकाणी निवेदन स्वीकारावे. अशी मानवता भावनेतून विनंती केली. परंतु मी आता आलेलो आहे तर कार्यालयाच्या दालनातच निवेदन स्वीकारतो. असे त्यांनी सांगितले. तसंच ते विल चेअर च आधाराने लंगडतच कार्यालयात गेले.
परंतु, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप लावल्यामुळे अखेर चावी घेऊन येण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. तोपर्यंत एका पायावर अपंगांसाठी असलेल्या विल चेअर च आधार घेऊन ते दालनाबाहेर उभे होते. त्या नंतर कुलपाची चावी सापडल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला व आंदोलकांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या जालनात प्रवेश करून निवेदन दिले.
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी करावी आणि दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी भारताचे राष्ट्रपतींच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
यावेळी विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हाध्यक्ष विजय गाढवे, जिल्हा उपाध्यक्ष उर्मिलाताई पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, सातारा शहर संघ चालक ॲड नितीन शिंगटे, सातारा शहर कार्यवाह रवी गायकवाड, सारंग कोल्हापुरे, अजित देशपांडे, श्रीधर कुलकर्णी, विजय फडके , कांतीलाल कांबळे ,प्रवीण रसाळ ,प्रमोद मोरे, विश्वास सावरकर मोहन शिंदे सदाशिव नाईक, दीपक केंडे, भास्कर शिंदे, महेश सवडकर, सुनील पवार, दिनेश जंगम, मानसिंग नलावडे, सचिन वाळवेकर,भा ज पा चे विकास गोसावी, आणि संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.