ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-माणुसकी जपणारे डी.टी.तथा दिलीप तुकाराम गायकवाड,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

माणुसकी जपणारे डी.टी.तथा दिलीप तुकाराम गायकवाड,,,

(लेखक – अजित जगताप, सातारा)
माणसाचे कर्तव्य हे त्यांनी केलेल्या कार्याने लोकांच्या पर्यंत पोहोचवले जाते. त्या माध्यमातील एक सोनेरी पान होणे अपेक्षित असते. तसेच माणसाने कर्तव्य करत असताना या हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला समजू नये. अशी गोपनीयता पाळली जाते.असे व्यक्तिमत्व म्हणजे डी टी गायकवाड तथा दिलीप तुकाराम गायकवाड हे आज सार्वजनिक बांधकाम विभागातून शासकीय सेवेतील वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. परंतु सामाजिक आघाडीवर नेहमी पुढाकार घेणारे डी टी म्हणजे एक सळसळते व्यक्तिमत्व आहे. त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणून कोणीही मर्यादा घालू शकत नाही. त्यामुळे ते जरी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले तरी समाजकार्या मधला त्यांचा अखंड वाहणारा प्रवाह कधी थांबणार नाही आणि थांबू नये. अशी माझ्यासह अनेकांनी इच्छा बोलून दाखवली आहे . रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष व नेते अशोक गायकवाड यांचे ते बंधू आहेत .
महाराष्ट्राच्या संघटनेमध्ये जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यरत असणारे डी टी गायकवाड हे सर्वांच्या मैत्रीचे आगार आहे. त्यामुळे जात — पक्ष- संघटना अशा कोणत्याही मर्यादा त्यांना कार्यरत असताना आलेल्या नाहीत. खऱ्या अर्थाने ते आपल्या स्वभावामुळे सर्वांच्या घरांमध्ये एक छोटासा घरटं बनविले आहे.
मुंबईसारख्या मोह नगरीत मध्ये वडिलांच्या शासकीय नोकरी निमित्त त्यांचे वास्तव्य बांद्रा येथील शासकीय वसाहतीमध्ये झाले. महात्मा गांधी विद्यामंदिर, बांद्रा पूर्व येथे प्राथमिक शिक्षण त्यानंतर चेतना कॉलेजला महाविद्यालयीन शिक्षण घेऊन ते बी कॉम झाले. मुंबई येथील मंत्रालयामध्ये स्पेशल केस म्हणून त्यांची शासकीय सेवेत दि २७ जुलै १९८३ साली निवड करण्यात आली. वयाने लहान असल्यामुळे त्यांना नोकरीचे फार अप्रूप वाटत होते. आपण शासकीय सेवेत असलो तरी सामाजिक बांधिलकी स्वीकारूनच आपल्याला काम करायचं आहे. अशी खूणगाठ त्यांनी बांधली होती. एकीकडे महाविद्यालयीन शिक्षण तर दुसऱ्या बाजूला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी नाळ असणाऱ्या पॅंथर संघटनेची ते जोडले गेले होते .छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा युगपुरुषांच्या सार्वजनिक जयंती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन अनेक मित्रपरिवार जोडले होते. हे काम करत असताना राजकीय पटलावर आपली निर्भीडपणाने छाप पाडणारे आदरणीय नेते नारायण राणे, एकनाथ गायकवाड, वर्षाताई गायकवाड ,चंद्रकांत हंडोरे, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे ,नामदेव ढसाळ, ज वि पवार, अविनाश म्हातेकर, ॲड. जनार्दन चांदुरकर ,बाबुराव माने, राजा ढाले, वामन मेश्राम, मधुकर सरपोतदार, श्रीकांत सरमळकर, मनोहर जोशी अशा अनेक लोकांच्या संपर्कात येऊन त्यांनी आपल्या कार्याची बांधणी केली होती. शासकीय सेवेमध्ये असताना आचारसंहितेचे काटेकोरपणाने पालन करावे लागते. निवडणुकीचा अपवाद वगळता त्यांनी कधीही आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पार्सिलिटी केली नाही. बांद्रा, कलानगर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रा सू गवई यांचे त्यांना आशीर्वाद लाभले होते. त्या काळचा तरुणाई समाजवाद, पँथर व शिवसेनेशी जोडली गेलेली होती . डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यामध्ये स्वतःला झोकून देऊन त्यांनी आपले काम केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आदरणीय नेते भाई संगारे, मनोजभाई संसारे, तानसेन नानावरे तसेच वरळी येथील आर एन चव्हाण मास्तर, जालिंदर कीर्तीकर, अशोक बापू गायकवाड, अमोल गंगावणे, मिलिंद कांबळे, प्रकाश वायदंडे अशा मान्यवर व्यक्तींचाही त्यांना सहवास लाभला. गांधीनगर या ठिकाणी त्यांनी पहिली रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन केली होती. आज त्या गांधीनगर मध्ये पॅंथर नेते रामदास आठवलेसाहेब यांचा संविधान बंगला आहे .पूर्वी त्या ठिकाणी एम. आय. जी. कॉलनी व ओपन नाट्य दरबार भरत होता.ते थिएटर होते. त्याकाळी अनेक मान्यवरांनी कार्यक्रम केलेले आहेत. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरी चळवळीमध्ये शायरी व जलसा कार्यक्रम पर्वणी होती .जलसा कार्यक्रम म्हणजे आंबेडकर चळवळीचे धगधगणारी तोफ होती.ती पेटवण्याचे काम करत होते. याच तोफेच्या विचाराने मशाली पेटवून शाहीर गोविंद म्ह शिलकर , वामन कर्डक, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, प्रल्हाद शिंदे, साहित्यिक वामन ओव्हाळ, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अरुण कांबळे,अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवणकर,,उर्मिला पवार अशा अनेकांच्या शायरी व साहित्याच्या माध्यमातून त्यांनी विपुल वाचन सुद्धा केलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून श्याम मानव यांच्या विचाराचाही प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे. दलित व आंबेडकर चळवळीतील स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे माजी खासदार जे. के. माने यांची नात वंदना यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी त्यांना पार पाडावी लागत आहे. आजही त्यांना मोलाची साथ देणाऱ्या सौ वंदना वहिनी आणि त्यांचे व्यावसायिक पुत्र राज व प्रतीक तसेच विद्याविभूषित सूना प्रज्ञा व हर्षदा, नातवंड असा गायकवाड परिवार बहरला आहे. मुंबईमध्ये रिडल्स ऑफ राम अँड कृष्णा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथामुळे हा भाग वेगळा करुन ते प्रकाशित करू नये.यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात साहित्यकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला मोलाची साथ देणारे लोकसत्तेचे संपादक माधव गडकरी यांचे त्यांना फार कौतुक वाटत होते. असे सर्वांचे लाडके दिलीप तुकाराम गायकवाड यांचा सातारा शहर व सातारा जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्कार व सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या दुसऱ्या इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी गोडोली येथील अक्षदा मंगल कार्यालय, सातारा या ठिकाणी दि ४ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक ते चार वाजेपर्यंत हा आनंदी सोहळा साजरा होत आहे. या आनंदी सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून त्यांचा मित्रपरिवार यांना उत्सुकता लागलेली आहे. अनिल वीर ,ॲड.विलास वहागावकर वामन म्हस्के, सुधाकर काकडे, विश्वास जगताप, रघुनाथ सरतापे, सोमनाथ जाधव, कृणाल गडांकुश असे अनेक हितचिंतक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
आता सातारा जिल्ह्यातील पोवई नाका येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील श्री गायकवाड हे ज्या ठिकाणी शासकीय सेवा करण्यासाठी बसत होते. ती खुर्ची त्या खुर्चीमध्ये ते पुन्हा दिसणार नाही. परंतु, त्यांचे अनेक किस्से ऐकायचे असतील तर ते तुम्हाला त्या कार्यालयातील भिंती सुद्धा सांगू शकतील. असा त्यांनी अनुभवाचा खजिना ठेवलेला आहे. त्यांना न्यायमंच संस्थेच्या वतीने मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो भविष्यात राजकीय पटलावर त्यांचा पुत्र प्रतिक गायकवाड यांनी गरुड झेप घेतली आहे . आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय राजेश क्षीरसागर, अशोक बापू गायकवाड, राजा सरवदे, आण्णा वायदंडे सारख्या अनेक मान्यवरांचे लाडके युवा नेते प्रतिक गायकवाड सुद्धा सामाजिक कार्यातून आपलं प्रतिक निर्माण करेल .अशी आशा वाटत आहे. दिलीप गायकवाड यांच्या सेवानिवृत्त निमित्त हार्दिक शुभेच्छा.. धन्यवाद
—— पत्रकार अजित जगताप मु . पो. सायगाव तालुका- जावली जिल्हा- सातारा मोबाईल नंबर 99 22 24 12 99
—&——————————————-

महत्वाची चौकट —शासन सेवेत काम करत असताना श्री गायकवाड यांना सा. बां. माजी सचिव आर टी अत्रे, व्ही. सी.राणे, एन. व्ही. मेरानी,,ए.जी.बोरकर, मुख्य अभियंता, ए.जी. पोळ,व्ही.एन.देशपांडे,यु.एस.कलगुटकर,आर.आर.चोंकर, डी.के कान्हेरे,ए.जे.जगताप तसेच मुख्य अभियंता एस.एन.राजभोज,आर.पी. निघोट, एल.एन.वाघमोडे आदी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते . या सर्वांचे सहकार्य त्यांना प्राप्त झालेले आहे.

——————————–+—-
फोटो – डी टी गायकवाड

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button