कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-एका बाजूला साताऱ्यात दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला निष्काळजीपणाने कहर …..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

एका बाजूला साताऱ्यात दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला निष्काळजीपणाने कहर …..

सातारा दि: सध्या माण – खटाव तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही त्याबाबत दुष्काळ जाहीर केला नाही तर दुसऱ्या बाजूला वाई तालुका दुष्काळी जाहीर करून शासनाने वाईकरांना खुश केले. आता पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या दुष्काळजीपणामुळे मध्यरात्री धोम धरणाचा कालवा फुटून कोट्यावधी लिटर पाणी अक्षरशा शेतकऱ्यांच्या शेतात व अनेकांच्या संसाराला गालबोट लावून गेला आहे.
याबाबत आता चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, विजय पाटील ,धन्यकुमार जाधव व आबासाहेब साळुंखे यांनी केलेली आहे. धोम धरणातील पाणी शेतीला तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सातारा- सांगली जिल्ह्याला अनेक गावे सिंचनाखाली आलेली आहेत.
धरणातील कालव्यातून हे पाणी ग्रामीण भागात पोहोचते. परंतु ,अनेकदा निकृष्ट दर्जाचे पाटबंधारेचे काम व सूक्ष्म गळतीकडे दुर्लक्ष यामुळे सध्या कालवा फुटून कोट्यावधी लिटर पाणी शेजारील शेतात जाऊन शेतीचे नुकसान झालेलेच आहे. ऊसतोड कामगाराच्या संसारातही पाणी शिरल्यामुळे त्यांचे जगणे मुश्किल झालेले आहे. याबाबत आता पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल ? पण ज्यांच्या अकार्यक्षमतेमुळे सदरची घटना घडलेली आहे. त्या पाटबंधारे अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ? असा योग्य व रास्त प्रश्न शेतकरी संघटनेच्या वतीने विचारला जात आहे. वास्तविक पाहता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे सर्व कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे . अशा घटना घडत असल्याने यावर लगाम कोण लावणार ? असा आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर घटनेनंतर अनेक प्रसारमाध्यमांनी त्याचे चित्रीकरण दाखवले. पण, संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे धाडस केले नाही. हे धाडस करण्याचे काम खरं म्हणजे सर्वच घटकांनी केले पाहिजे.असे आता ऊसतोड कामगारी सांगू लागलेले आहेत.
वाई तालुक्यातील पांडे पेटीपुला येथील धोम डावा कालवा कॅनाल शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास फुटल्याने ओझर्डे येथील ओढ्याला अचानक पाणी वाढले .तेथे असलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या कोप्या वाहुन गेल्या नशिबाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. साखर झोपेत असतानाही थंडी वाऱ्याची पर्वा न करता काही सामाजिक कार्यकर्ते व कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील ऊस तोडणी मजुरांची आपुलकीने चौकशी करून आपण कोणतीही काळजी करू नये. व्यवस्थापन आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना लागणार्‍या गरजेचे सामान तातडीने पोहोच केले आहे. तसेच सकाळचा चहा व नाष्ट्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
याचबरोबरची सामाजिक संघटनांनीही या गरीब व कष्टकरी ऊसतोड कामगारांना मानवतावादी दृष्टिकोनाने मदतीचा हात दिलेला आहे. वास्तविक पाहता पाटबंधारे विभागाचे कालवे हे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. त्याची आतापर्यंत या देखभाल दुरुस्तीसाठी साडेतीनशे कोटी रुपये खर्च केले. या खर्चाचा वाटा अनेकांनी घेऊन आपली इमले बांधली. पण आता त्यांच्या अकार्यक्षम तुम्ही मुळे ऊसतोड कामगारांच्या कोप्या वाहून गेलेले आहेत. याबाबत आता सकल चौकशी करून जर दोष अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास भविष्यात धोम धरणाला पण मोठा गंभीर धोका झाल्या नंतर शासनाला जाग येईल का ? अशा शब्दात अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
————————————–&——–
फोटो सेशन— धोम धरणाचा ओझर्डे नजिक कालवा फुटल्यानंतर ऊसतोड कामगारांच्या संसाराची अशी दैना झाली..

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button