कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-साताऱ्यात डॉल्बी सँपल घेतली आता कारवाईचा आवाज निघेल का?

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात डॉल्बी सँपल घेतली आता कारवाईचा आवाज निघेल का?

सातारा दि: एखाद्या गोष्टीचा कितीही त्रास झाला तरी त्याबाबत मौन धारण केले की, भिंतीवरील पालीचा काही काळाने डायनासोर होतो आणि त्यामुळे त्याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. याची प्रचिती साताऱ्यात पाहण्यास मिळाली. डॉल्बी डिसेबल सॅम्पल पाहूनच कारवाई करण्याचा इशारा सातारा पोलीस दलाने दिला होता .तरीही डॉल्बी आवाजाने सातारा शहर हादरून गेले. जणू काय आमच्या पप्पांनी गणपती आणलाय,,, आमच्या पप्पांनी डॉल्बी लावलाय असेच गीत कानावर अजूनही आदळू लागले असल्याचा भास होत आहे.आता याबाबत कारवाई होणार का असा प्रश्न घराच्या बाहेर न पडता क्रांती झाली पाहिजे. असं मानणारे लोक विचारू लागलेले आहेत.
गणेश उत्सव पूर्वी डॉल्बीला निर्बंध घालण्याची एकमुखी मागणी करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे पोलिसांनी बोटचेपीचे धोरण स्वीकारूले होते.वास्तविक एखादा सामान्य माणूस पोलीस ठाण्यात आला की, तो आरोपी असल्यासारखी विचारपूस केली जाते .ठाणे अंमलदारांच्या परवानगीशिवाय कुठल्या बाजूला उभे राहायचे. हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार सामान्य माणसाला नसतो .परंतु काही व्यक्तींसाठी सातारा शहरात कायदा म्हणजे खेळणे झालेला आहे .याची प्रचिती अनेकदा आलेले आहे .याबाबत सातत्याने प्रसारमाध्यम आवाज उठवतो परंतु, आपला कार्यकाल संपल्यानंतर आपल्याला साताऱ्यातून अनुभवाची शिदोरी घेऊन जायचे आहे. अशी मनाशी खुणगाठ बांधून काही अधिकारी वागतात. हेच मोठे सातारकरांचे दुखणं ठरलेले आहे.
एरवी अनेक जण आपल्या पद्धतीने मांडणी करत असतात डॉल्बी बाबतही जनजागृती करण्यासाठी साताऱ्यातील प्रसारमाध्यमांनी लेखमाला लिहिली. परंतु, एकाही व्यक्तीने सातारा जिल्हाधिकारी अथवा सातारा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन डॉल्बीवर कारवाई करण्याची मागणी केली नाही. याचाच अर्थ आम्हाला विकास कामापेक्षा डॉल्बी प्रिय आहे. असाच त्याचा गुगल वरून अर्थ काढून कशा पद्धतीने लोक शांत बसले होते? परंतु ज्यांना विसर्जनाच्या दिवशी जो त्रास सहन करावा लागला. जो मानसिक व शारीरिक व्याधी भोगायला लागली . काहींचे कायमस्वरूपी अक्षरशः विसर्जन होण्याची वेळ आली होती. परंतु श्री गणरायाने या सर्व डॉल्बीच्या डेसिबल आवाज स्वतःच्या मोठ्या कानाने विघ्न दूर केलेअसे काही भाविक म्हणू लागलेले आहेत .
साताऱ्यातील नागरिकांच्या कानठळ्या बसवण्याच्या आवाजाने लहान बालके, आजारी लोक ,वयोवृद्ध व बेशुद्ध झालेल्या युवकाला वाहतूक पोलिसांनी जर वेळेस उपचार केले नसते त्या बिचार्‍याचे विसर्जन झाले असते. पण, श्री गणराया हा दयाळू असल्याने असं काही घडलं नाही. याचा मनस्वी आनंद वाटत आहे. गुरूवारी वास्तविक पाहता रात्री साडेदहाच्या वाजण्याच्या सुमारास मोती चौकात एकमेकांना सांगून सुद्धा ऐकू येत नव्हतं असा आवाजाचा मारा सुरू होता. सोबत ढकलाढकलीव चेंगराचेंगरी अशा अवस्थेमध्ये युवती व महिलांची फारच कुचुंबणा झाली होती. अनेकांना घाम फुटला होता .परंतु दोष कुणाला द्यायचा? आपण साताऱ्यात राहतोय हाच आपला दोष आहे? असे समजून अनेक जण गप्प बसले होते.
आता कार्यक्षम पोलीस यंत्रणेने डॉल्बी डिसेबल सॅम्पल घेतलेले आहे. पोलीस यंत्रणेने कायदा व सुव्यवस्थेच्या डिसिबलने डॉल्बी सिस्टीमच्या आग्रह करणाऱ्या लोकांच्या कानामध्ये आवाज सोडावा म्हणजे त्यांना कायद्याचा धाक समजून येईल. मोती चौकात तसेच इतर ठिकाणीही सायंकाळी चार वाजल्यापासून डॉल्बी सिस्टीम मिक्सर व यंत्रणा कार्यरत करण्यासाठी आणि पोलीस मात्र शांतपणाने हे सर्व पाहत होते. ही शोकांतिका आहे . गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी काय पाकिस्तानात वाजवायची का ? आणि या डॉल्बीच्या आवाजाने जर कोणी मयत झाले तर त्याच्या आम्हाला सुतक येणार आहे का ? आमच्या पप्पांनी गणपती आणलाय,,,, आमच्या पप्पांनी डॉल्बी आणलाय,,,, टुकूटुकू कोण बघते बघा असे आता विनोदाने बोलले जात आहे.

एक दिवस असा येईल जेव्हा ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या रोगांचा फास असेल. या रोगांशी लढणं तितकंच अवघड असेल जितकं गेल्या शतकात प्लेग किंवा कॉलराशी लढणं अवघड होतं.”अशा शब्दात नोबेल पारितोषिक विजेते जीवाणू तज्ज्ञ रॉबर्ट कोच यांनी १९०५ साली संकेत दिले होते.हे ११५ वर्षाने तंतोतंत खरे ठरले आहे.

डॉल्बी संबधित पाला या संघटनेने याचिका दाखल केली होती.त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय झाला होता.. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी आणि डी जे वर घातलेली बंदी उठवायला उच्च न्यायालयाने नकार दिला होता. काहींना हा निर्णय योग्य वाटतो तर काहींना हा धार्मिक सणासुदीला अशी बंदी कशाला हवी? असे वाटत होते.
भरीस भर म्हणून काही नेत्यांनी तरुणांच्या मतावर डोळा ठेवून या डॉल्बी बाबत समर्थन केले होते. मुळातच अशा नेत्यांच्या घरामध्ये शास्त्रीय संगीत वाजवले जाते पण कार्यकर्त्यांच्या गल्लीमध्ये डॉल्बी वाजवली की दहा मिनिटे नाच गाणं केले की कार्यकर्ते व तरुणाई खुश होते. हा आता नवीन पायंडा झालेला आहे.

कोर्टाचा आदेश असतानाही पुन्हा एकदा ‘आपण डॉल्बी वाजवणारच’ अशी ठाम भूमिका काहींनी घेतली होती. त्याची परत फेड निवडणुकीत झाली होती. पण,कार्यकर्त्यांना ते अजूनही समजले नाही. गणेशोत्सव मंडळाची परवानगी असेल तर बिनधास्त डी जे वाजवा, असं डीजे-डॉल्बीवाल्यांना नेत्यांनी जाहीरपणे सांगून एक प्रकारे याला पाठिंबाच दर्शवला होता .
सण येत जात राहतील, मात्र उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असं व उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना राज्य सरकारला सुनावलं होतं.ज्या डीजे-डॉल्बीवरून राज्यात एवढं रान पेटलं आहे, त्याच्या दणदणाटाचे आपल्या आरोग्यावर हृदयविकार, डायबेटिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात आहे. त्याच्यासाठी तरी डॉल्बीवर कारवाई करा अशी विनंती होत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button