पुसेसावळी:-(खटाव)ग्राम सुरक्षा यंत्रणा होणार कार्यान्वित… सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
ग्राम सुरक्षा यंत्रणा होणार कार्यान्वित… सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम.
पुसेसावळी प्रतिनिधी. दि 13 डिसेंबर.
अतिशय महत्वपूर्ण यंत्रणा चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद… पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात प्रभाविरित्या ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार – श्री धोंडीराम वाळवेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक औंध पो.स्टे.
चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद, ग्रामसभा,सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार* – *डि.के.गोर्डे संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा.
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री.समीर शेख ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.ज्ञानेश्वर खिल्लारी यांच्या प्रयत्नातून ,व सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज वार बुधवार दिनांक 13/12/2023 रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 18002703600/9822112281 प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम पुसेसावळी (कलाई गार्डन, येथे आयोजित करण्यात आले .सदर कार्यक्रमास औंध पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी API धोंडीराम
वाळवेकर,PSI अक्षय ढिकणे,गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,श्री.सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा,पंकज
भुजबळ,पोलीस हवालदार राहुल सरतापे यांच्यासह औंधपोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव, अशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर *18002703600/9822112281* वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री.डी.के.गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन मा.श्री धोंडीराम वाळवेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक औंध पो.स्टे यांनी केले.
*ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.
गेल्या 14 वर्षांत पुणे,सोलापूर, अहमदनगर,धाराशिव,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो. संबंधीत ग्रामस्थानी ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले